शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुका जि.प.तील सत्तेला सुरूंग लावणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST

दरम्यान २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी २०१८ मध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ७३ ...

दरम्यान २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी २०१८ मध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ७३ टक्के आरक्षण काढण्यात आले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. निवडणुका झाल्या तरी या याचिकेवर कामकाज सुरू हाेते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असे जाहीर करीत नवीन आरक्षण काढून दोन आठवड्याच्या आत १५ जागांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

दरम्यान या निर्णयामुळे धुळे तालुक्यातील ११ व शिंदखेडा तालुक्यातील ४ गटातील सदस्यांवर गंडांतर आलेले आहे.

दरम्यान २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत धुळे तालुक्यातील १५पैकी बोरकुंड व नेर या दोन गटातच भाजपला विजय मिळविता आला होता. तर कॉंग्रेसला ९ जागा मिळालेल्या होत्या. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत भाजपने तब्बल १० जागांवर विजय मिळविला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनासाठी भाजपला धुळे तालुक्याची मोठ्या प्रमाणात मदत झालेली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर धुळे तालुक्यातील ११ गटातील सदस्यांच्या सदस्यतेत्वर गंडांतर आलेले आहे. त्यात भाजपचे ८, शिवसेनेचे दोन व कॉंग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. आता या ११ गटांसाठी पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडीची सत्ता आहे. अनेक ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येत निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे राज्याचा हा पॅटर्न धुळे तालुक्यात राबवून धुळे तालुक्यात तिन्ही पक्ष एकत्रित येऊन भाजपच्या सत्तेला सुरूंग लावणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. निकालानंतर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आम्ही जिल्हा परिषदेत सत्तांतर करून दाखवू, अशी भविष्यवाणी केलेली आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील ११ गटांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरच विद्यमान सत्ताधाऱ्यांची भिस्त अवलंबून राहणार आहे. मात्र मिळालेली सत्ता भाजपचे नेते, कार्यकर्ते सहजासहजी जाऊ देतील, असे वाटत नाही. निवडणुका झाल्यास ते देखील चांगलीच रणनीती आखतील यात शंका नाही.