शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आठ महिन्यांत तीन महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST

आपली मुलगी ही वयात आलेली असताना तिच्या गरजा कोणत्या, ती कोणासोबत जास्त वावरताना दिसून येते, पालकांना कोणते कारण सांगून ...

आपली मुलगी ही वयात आलेली असताना तिच्या गरजा कोणत्या, ती कोणासोबत जास्त वावरताना दिसून येते, पालकांना कोणते कारण सांगून ती घराबाहेर पडते, तिचे मित्र, मैत्रिणी कोण आहेत, यासह अनुषंगिक बाबी आता पालकांनी चोखंदळपणे तपासायला हव्यात. पण, या बाबींची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने अपहरणकर्त्यांना ते सोईचे ठरत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गत वर्षीच्या तुलनेत वाढ

मुलींचे अपहरण करणे, महिलांचा विनयभंग करणे, त्यांच्यावर अत्याचारासारखे प्रसंग ओढवून आणणे अशा घटना या सध्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात एकप्रकारे वाढच झाली आहे. हे रोखण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

विकृती मोडीत काढावी

- दिवसेंदिवस अशा प्रकारची विकृती ही मोडीत काढण्याची गरज आहे. पण, ही विकृती नेमकी मोडीत काढणार कोण हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.

- बहुतेकवेळा वयात आलेल्या तरुणी या आमिषाला बळी पडत असतात. त्या बळी पडतात म्हणूनच त्यांचे अपहरण करणे विकृत मनाच्या व्यक्तीला खूपच सोईचे ठरत आहे. त्यात लग्न हेदेखील प्रमुख कारण असल्याचे म्हणावे लागेल.

अल्पवयीन मुली

येतात जाळ्यात

अपहरण करण्याचा उद्देश मनात बाळगणाऱ्या विकृत मनाच्या व्यक्तींना मुलींचे अपहरण करणे सहज शक्य होत असल्याचे समोर येत आहे. यात पालकांचा संवाद हरवत असल्याने ही बाब घडत आहे. आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रमाण कमी न होता वाढत आहे. हे रोखण्यासाठी पालकांनी लक्ष द्यायला हवे.

गुन्ह्यांची उकल ही अल्पच

अपहरण, अत्याचार अथवा पळवून नेण्याच्या घटना घडत असताना त्यांचा शोध लावण्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. पालकांनीदेखील पोलीस प्रशासनाला साथ दिल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्याची उकल होणे सोपे होऊ शकते.