शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सूरत-नागपूर महामार्गाचा भराव पहिल्याच पावसात खचला; नेर बायपासजवळ शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

सूरत-नागपूर महामार्ग नेर येथून बायपास जात असून, यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. परंतु, महामार्ग तयार करणाऱ्या संबंधित ...

सूरत-नागपूर महामार्ग नेर येथून बायपास जात असून, यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. परंतु, महामार्ग तयार करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट केल्याचे पावसानंतर उघड झाले आहे. नेर येथील महाल रायवट आणि महालकाळी या शिवारातून जाणाऱ्या या महार्गावरील अनेक शेतकऱ्यांना या निकृष्ट कामाचा फटका बसला आहे.

महामार्गाचे चौपदीकरण करताना सर्व्हिस रोड करण्यात आलेला नाही, तर ठेकेदाराने महामार्गाच्या बाजूला माती टाकून भराव केला आहे. परंतु, हा भराव करताना ते व्यवस्थित दाबलेला नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यात हा भरावही वाहून गेला आहे. तसेच नेर येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्ग चौपदकरीकरणाच्या पलीकडे असल्याने त्यांना शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ताही करून दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी माल नेण्यासाठी आणि शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा बैलगाडी उलटून अपघातही होत आहे. या समस्या संबंधित ठेकेदाराला सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

महामार्गाचे काम निकृष्ट केल्याने भराव वाहून गेला आहे. तसेच आउटलेटचे पाणीही तुंबून ते शेतात जात आहे. यामुळे शेताचे आणि महामार्गाचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड तयार केला असता तर शेतकऱ्यांची समस्या दूर झाली असती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही समस्या न सुटल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. - योगेश गवळे, शेतकरी, नेर

पिके सडू लागली

महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्गावर आऊटलेट टाकण्यात आले आहे. परंतु, तेही टाकताना निष्काळजीपणा केल्याने पाण्याचा निचरा न होता ते तुंबून राहिल्याने मध्येच हा महामार्ग खचला आहे. यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच हे पाणी महामार्गाला लागून असलेल्या शेतांमध्ये शिरले आहे. उभ्या पिकात हे भराव केलेल्या रस्त्याचे खारट पाणी शिरल्याने पिके सडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.