शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मांडळ धरणातून बोरी नदीपात्रात पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST

या गावांकरिता मांडळ धरणातून आवर्तन सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेची बैठक ४ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. ...

या गावांकरिता मांडळ धरणातून आवर्तन सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेची बैठक ४ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणेच्या शिफारशीनुसार या धरणातून ३.०३७ दशलक्ष घनफूट आरक्षित पाणी १० मेनंतर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तहसीलदार, धुळे ग्रामीण यांनी टंचाईसदृश स्थिती असल्याचा अहवाल सादर केला आहे. मांडळ, बोरकुंड, रतनपुरा (ता. धुळे) या गावांपर्यंत पाणी घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, उप अभियंता वीज वितरण कंपनी, पोलीस निरीक्षक, उपअभियंता पाटबंधारे विभाग व तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्तिकरीत्या राहील. पाटबंधारे विभागाने त्यांच्या स्तरावर उक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक स्थापन करून या पथकाने नदीप्रवाहात अवैधरीत्या पाणी अडविणे व अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. पाणीपट्टीची रक्कम कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांनी पाटबंधारे विभागास जमा करून देऊन त्यानंतरच पाणी सोडण्याची कार्यवाही करावी. संबंधित गावांना आवर्तन सोडल्याबाबत विविध माध्यमांतून अवगत करण्याची कार्यवाही संबंधित कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांनी करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी यादव यांनी आदेशात नमूद केले आहे.