शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षा आवश्यकच, पण अभ्यासक्रम एकच असावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

भूषण चिंचोरे धुळे - वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही पूर्वपरीक्षा घेणे आवश्यक आहे. पण पूर्ण देशभरातील अभ्यासक्रम एकच ...

भूषण चिंचोरे

धुळे - वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही पूर्वपरीक्षा घेणे आवश्यक आहे. पण पूर्ण देशभरातील अभ्यासक्रम एकच असावा असे मत धुळ्यातील शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तामिळनाडू राज्याने नीट परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असल्याचे सांगितले आहे. तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाबाबत शिक्षण तज्ज्ञ व विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. काही विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा घेऊ नये तर काहींनी परीक्षा घ्यायला हवी असे मत मांडले.

राज्यातील अभ्यासक्रमापेक्षा नीट परीक्षेचा अभ्यासक्रम अधिक व्यापक असतो. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये सुसंगतपणा आणणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या परीक्षेचा विद्यार्थी व पालक अधिक ताण घेतात. अनेक विद्यार्थी दबावात ही परीक्षा देत असतात. नीटची परीक्षा तणावमुक्त वातावरणात व्हायला हवी तसेच परीक्षेसाठी केला जाणारा खर्च व दबाव दोन्ही कमी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय ?

नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू राज्यातील विधानसभेत मांडले गेले आणि संमत ही झाले. सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत.

धक्कादायक निर्णय

वैद्यकीय शिक्षणासाठी नीट परीक्षा आवश्यक आहे. मात्र त्यात काही बदल होणे आवश्यक आहेत. बारावीचा अभ्यासक्रम व नीट परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. नीट परीक्षेसाठी संपूर्ण देशातील बारावीचा अभ्यासक्रम एकच असावा.

डॉ. प्रा. पी. एच. पाटील

प्राचार्य, जयहिंद महाविद्यालय

वैद्यकीय शिक्षणासाठी पूर्व परीक्षा आवश्यकच आहे. पण विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे दडपण घेऊ नये. या परीक्षेसाठीचा खर्च व तणाव दोन्हीही कमी झाले पाहिजेत. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी.

डॉ. प्रा. एम. व्ही. पाटील

प्राचार्य, घोगरे महाविद्यालय

नीट ही राष्ट्रीय स्तरावरची एक महत्त्वाची परीक्षा आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्या सर्वांनाच प्रवेश मिळणे शक्य नाही. चाळणीचे कमी ही परीक्षा करत असल्याने महत्त्वाची आहे.

- संघर्ष पवार, विद्यार्थी

नीट ही परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे सोपे जाते. ही परीक्षा पारदर्शकपणे घेतली जाते. राज्याच्या स्तरावर अशी परीक्षा झाली तर पारदर्शकपणे होणार नाही असे वाटते.

- सृष्टी सूर्यवंशी, विद्यार्थी