शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारांतर्गत ग्रामीण भागात कडधान्य तर शहरात फक्त मिळतो तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण ...

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. दरम्यान मार्च २०२०पासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने, सर्वच शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कडधान्य,डाळ व तांदळाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान ग्रामीण भागात कडधान्य व डाळ तर शहरी भागात फक्त तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. धुळे तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंत पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९७ हजार ८०० एवढी आहे.

घरपोच आहार

शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी शालेय पोषण आहार योजेनेंतर्गत शाळेतच आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जात होता. मात्र मार्च २०२०पासून देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने, राज्य शासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान कोरोनाबाबत नियमांचे पालन करून गेल्यावर्षी एप्रिल-मे पासूनच विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहाराचे वितरण करण्यात येऊ लागले. आता शाळा जरी सुरू झालेल्या असल्या तरी अद्याप शाळांमध्ये आहार देण्याऐवजी विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे साहित्य देण्यात येत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.