शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:44 IST

धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं अशी नवी घोषणा दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. आता धुळे येथे झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी घोषणा देत 'एक हैं तो सेफ हैं', असे म्हटले होते. बटेंगे तो कटेंगे या घोषणेची ही पुढची आवृत्ती असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याआधी वाशिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी, हम एक हैं तो नेक हैं और एक हैं तो सेफ हैं, असं विधान केलं होतं. आपल्यात विभाजन व्हायला नको. जेंव्हा आपल्यात फूट पडली तेंव्हा आम्ही कापले गेलो आहोत, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी, काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करण्याचा धोकादायक खेळ खेळत असल्याचे म्हटलं आहे.

"आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूटता काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपायला हवी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे विभाजन झालं होतं. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"महाविकास आघाडी हे एक असे वाहन आहे ज्याला ना चाक आहे ना ब्रेक आणि तिथले प्रत्येकजण ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी भांडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीमुळेच महाराष्ट्राचा जलद विकास होईल. आम्ही जनतेला देवाचे दुसरे रूप मानतो, पण काही लोक जनतेला लुटण्यासाठी राजकारण करत आहेत. जेव्हा मी महाराष्ट्राकडे काही मागितले तेव्हा राज्यातील जनतेने मला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाचा जो वेग सुरू आहे तो थांबू दिला जाणार नाही, याची ग्वाही मी देतो. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारच महाराष्ट्राला आवश्यक असलेले सुशासन देऊ शकते," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकdhule-city-acधुळे शहरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस