शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित दिवी गावात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST

पुनर्वसित होत असलेल्या दिवी गावाच्या गावठाणमध्ये विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च ...

पुनर्वसित होत असलेल्या दिवी गावाच्या गावठाणमध्ये विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे; परंतु पुनर्वसन गावठाणमधील भूखंड वाटपातील अनियमितता, कच्चे रस्ते,पाणी पुरवठा योजना, यांसारख्या विविध नागरी सुविधांची झालेली निकृष्ट दर्जाची कामे यामुळे आजही दिवी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न कायमच आहे. भूखंड वाटप व नागरी सुविधांवर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजपूत यांनी केली आहे.

शिंदखेडा तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. या तालुक्यातील गावांची पाणी टंचाई दूर व्हावी व शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी बुराई नदीवर वाडी शेवाडी मध्यम सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पांतर्गत वाडी व दिवी ही गावे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येतात. यापैकी वाडी गावाचे पुनर्वसन झाले असून, दिवी गावाचा पुनर्वसनासाठी गावापासून पाच-सहा किमीवर असलेला शासकीय भूखंड आरक्षित करण्यात आला. सुमारे तीनशेच्यावर कुटुंबांचे पुनर्वसन या भूखंडात करण्यात येत आहे. या पुनर्वसित क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पुनर्वसन गावठाणातील भूखंड चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने वाटप करण्यात आले आहेत. यातील काही लाभार्थ्यांना अधिक क्षेत्रफळाचा भूखंड तर काहींना कमी क्षेत्रफळाचा भूखंड देण्यात आला आहे.

नागरी सुविधांवर बारा कोटी रुपये खर्च; मात्र सुविधांचा अभाव---

दिवी गावाच्या पुनर्वसन क्षेत्रात अठरा विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बारा कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च केला; मात्र या नागरी सुविधांचा प्रकल्पबाधितांना उपयोग होत नसल्याने या सुविधांवर खर्च झालेला शासनाचा पैसा वाया गेल्यासारखी स्थिती आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी सव्वादोन कोटी निधी मंजूर झाला, त्यापैकी दोन कोटी १३ लाख ६४ हजार रुपये ठेकेदाराला दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र या पाणीपुरवठा योजनेचा लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळत नाही. पाणी पुरवठ्याची विहीर काटेरी झुडपात असून, विहिरीपासून ३०० मीटर लांब पंप गृह बांधला असून, या विहिरीपर्यंत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

देवी पुनर्वसन क्षेत्रात शाळा, समाज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, बस थांबा, गुरांसाठी पाणी पिण्याचा हौद, बाजारओटे, सार्वजनिक शौचालय, मुतारी, यासाठी ३९ लाख १३ हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे. अनेक कामे निकृष्ट दर्जाची असून, यातील अनेक सुविधांपासून लाभार्थी वंचित आहेत. येथे यू आकाराच्या गटारी, अंतर्गत रस्त्याची कामे केली. यासाठी पाच कोटी ८८ लाख ७७ हजार रुपये निधी खर्च झाला. असे असतानाही परिसरात रस्त्यांचा अभाव आहे.

स्मशानभूमीची दुरवस्था::--पुनर्वसित क्षेत्रात एक ते दीड कि.मी.वर बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची तर पार दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, अंत्यसंस्कारासाठी ओटे नाही. अंत्ययात्रेत आलेल्या नागरिकांना थांबण्यासाठी निवारा नाही, अश्या अनेक समस्यांनी वेढलेल्या या स्मशानभूमीनेच प्राण सोडला आहे.