शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जवाहर ट्रस्टच्या सिंचन चळवळीची कमाल, बंधारे झाले तुडुंब, नाले खळखळून वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

माजी कृषी व पाटबंधारे मंत्री रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व ...

माजी कृषी व पाटबंधारे मंत्री रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व संकल्पनेतून धुळे तालुक्यात गेल्या ११ वर्षांपासून नाला व बंधारे खोलीकरणाची चळवळ राबविण्यात येत आहे. माथा ते पायथ्यापर्यंत नदी, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले आहे. धुळे तालुक्यात सुमारे १०२ गावांत तब्बल ४०० हून अधिक बंधाऱ्यांचे खोलीकरण-रुंदीकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आज सात हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत आहे. कन्हेरी नदी, वाघी नदी, पांझरेवरील फड बंधारे, विविध पाझर तलावांचे पुनरुज्जीवन करून तालुक्यातील सिंचन चळवळीला गती मिळाली आहे. धुळे तालुक्यातील धनूर-तामसवाडी शिवारातील खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलेला नाला यंदा पावसाच्या पहिल्याच टप्प्यात पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. या कामामुळे धनूर, कापडणे, तामसवाडी या गावांतील सुमारे १५० शेतकऱ्यांच्या शेतीला लाभ मिळत आहे. या शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी उंचावली असून, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ होऊन उत्पन्न वाढल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

दरम्यान, धनूर येथील चेतन शिंदे, अशोक पाटील, हिरामण चौधरी, कैलास शिवाजी पाटील, शांतूभाई पटेल, साहेबराव कोळी, संभाजी शिंदे, परमेश्वर पाटील, प्रकाश गुजर, आदी शेतकऱ्यांनी पाण्याने भरून वाहणाऱ्या नाल्याला भेट दिली व आमदार कुणाल पाटील यांनी केलेल्या सिंचनाच्या कामामुळे आज आमच्या शेतातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सिंचनाला प्राधान्य : आमदार पाटील

धुळे तालुक्यात माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या संकल्पनेला गती देत मी नेहमीच सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. शेतकरी सुखी झाला तर तालुका समृद्ध होऊ शकतो. त्याकरिता जवाहर ट्रस्टची सिंचन चळवळ प्रभावीपणे राबविली जात आहे. आज त्याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत असून, याचा मला मनस्वी आनंद आहे. यापुढेही ही चळवळ अशीच सुरू ठेवत धुळे तालुका शंभर टक्के बागायती करण्याचा मानस आहे.

- कुणाल पाटील

आमदार, धुळे ग्रामीण