शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

मानसिक ताण वाढला; आता जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:37 AM

धुळे : कोरोनाकाळात समाजातील प्रत्येक घटकामध्ये मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वत्र नकारात्मक घडामोडी घडत असल्याने आता ...

धुळे : कोरोनाकाळात समाजातील प्रत्येक घटकामध्ये मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वत्र नकारात्मक घडामोडी घडत असल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न जाहीरपणे विचारला जाऊ लागला आहे.

बहुतेक तरुणांसह आणि पुरुषांमध्ये रोजगार गमावल्याचा ताण आहे, महिलांमध्ये आर्थिक काटकसरीने संसार चालविण्यासह मुलाबाळांची काळजी घेण्याचा ताण वाढला आहे तर वृद्धांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. नकारात्मक घडामोडींच्या या काळात शासन, प्रशासन साऱ्यांनाच धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मानसशास्त्र तज्ज्ञ प्रा. वैशाली पाटील यांनी सांगितले की, खरे तर स्वतःवरील श्रद्धा आणि विश्वास मनाची शक्ती वाढवतात. तुम्ही समुद्राच्या लाटा थांबवू शकत नाही. परंतु लाटांवर स्वार कसे व्हायचे हे मात्र शिकू शकतात. वेळोवेळी हात धुणे, सॅनिटाइजर, मास्कचा वापर करून नियमांचे पालन करावे. लसीकरण करून सुरक्षित व्हावे यासह हा काळदेखील निघून जाईल आणि आपण नव्या दमाने उभे राहू, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, अशा शब्दात धीर दिला.

पुरुष सर्वाधिक तणावात

पुरुषांवर कुटुंबाची जबाबदारी असते. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेला आहे तर काहींचे उत्पन्न कमी झाले आहे. शिवाय कुणाला कोरोना झाला तर काय होईल या विचाराने पुरुष सर्वाधिक तणावात आहेत.

कोण म्हणतो, पुरुष व्यक्त होत नाहीत?

पुरुष सहसा व्यक्त होत नाहीत असे म्हणतात. पुरुष कठोर मनाचे असतात असे नाही तर पुरुषी मानसिकतेमुळे ते तसे भासवित असतात. परंतु कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करणारे पुरुष कमालीच्या तणावाखाली आहेत. सध्या ते कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि समुपदेशकांपुढे व्यक्त होताना दिसत आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.

तरुणांचे प्रश्न वेगळेच

तरुणांचे प्रश्न वेगळेच आहेत. गेल्यावर्षी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर निघालेल्या तरुणांना कोरोनामुळे परत घरात बसावे लागले.

आधीपासून विविध उद्योग, दुकानांमध्ये कामावर असलेले अनेक तरुणदेखील बेरोजगार झाले. या काळात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली.

उद्योजक आणि व्यावसायिकांनीदेखील कुशल मनुष्यबळवगळता अकुशलच्या बाबतीत काैटुंबिक जबाबदारीचा निकष लावल्याने प्राैढांऐवजी तरुणांवर कामगार कपातीची कुऱ्हाड कोसळली.

कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी आहे. तरुणांचा ओढा असलेली क्षेत्रे ठप्प असल्यासारखी आहेत.

रोजगाराअभावी तरुणांमध्ये ताण अधिक वाढला आहे. रोजगार नाही तर लग्नदेखील नाही ही सर्वात मोठी समस्या आहे.

नोकरी गेली, आता काय करू?

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोनाचा संसर्ग आणि लाॅकडाऊन, सततची संचारबंदी, आताचे कठोर निर्बंध यामुळे निम्मे उद्योग, दुकाने बंद आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे तर अनेकांना कमी दिवस काम मिळत आहे. ज्यांच्या रोजगार गेला त्यांना अन्यत्र काम मिळणे कोरोनामुळे सध्यातरी कठीण आहे. त्यामुळे नोकरी गेली, आता काय करू असा प्रश्न आहे. दुसरीकडे बेरोजगार आणि उद्योजकांमध्ये समन्वय साधून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनाचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे.

लक्षात घ्या मेंदूचे खाद्य तुमचे विचार असतात जसा विचार करतात तसा मेंदू काम करतो. नकारात्मक विचारांनी मेंदूतील सिसोटोनिन, नाॅरएपिनेफ्रीन, डोपामाइन आणि गॅमा यांच्यातला तोल बिघडला की व्यक्ती भयग्रस्त होऊन व्यक्ती कोरोना सोबत लढायला असमर्थ ठरते. म्हणून सर्वप्रथम घाबरू नका, नियमांचे काटेकोर पालन करा. तुमची जगण्याची तीव्र इच्छाशक्तीच तुम्हाला बळ देईल.

प्रा. वैशाली पाटील, मानसशास्त्र तज्ज्ञ