शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी ...

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते. मात्र गेल्या दोन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे बागायती पिके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वात जास्त कल असतो. जिल्ह्यात गेल्या सात वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झालेली दिसून येते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८८ हजार हेक्टर ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. तर १६-१७ या वर्षात ७५०० हेक्टरने वाढ होत १ लाख ९६ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली. त्यानंतर १७-१८ या वर्षात ९४०० हेक्टरने वाढ होत २ लाख ५ हजार ३८३ हेक्टरपर्यंत लागवड करण्यात आली. २०१८-१९ मध्ये २ लाख ३२ हजार ७००, २०१९-२० मध्ये २ लाख २४ हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली होती. दरम्यान २०२०-२१ मध्ये तब्बल १५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात वाढ होत, २ लाख ४० हजार २०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली होती. ही आतापर्यंत सर्वात जास्त कपाशीची लागवड असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०२१-२२ मध्ये २ लाख २३ हजारचे उद्दिष्ट

यावर्षीही शेतकऱ्यांचे कापूस लागवडीलाच प्राधान्य असून, कृषी विभागातर्फे २ लाख २३ हजाराचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत असल्याने, कपाशीचे क्षेत्र वाढत चालले आहे.

भाताची लागवड कमी

धुळे जिल्ह्यातील माळमाथा परिसरात भाताची लागवड करण्यात येत असते. दोन वर्षात दमदार पाऊस झाल्याने,भाताची लागवडीत वाढ होणे अपेक्षित होते. मात्र २०१९-२० मध्ये ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. तर २०२०-२१ मध्ये २२०० हेक्टरने भाताचे क्षेत्र कमी होत ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड झालेली होती. तर २०२१-२२ मध्ये अजून १०० हेक्टर क्षेत्र कमी झालेले असून, यावर्षी फक्त ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

गेल्या काही वर्षात कापसाची अनेक वाण विकसित झालेले आहेत. त्यामुळे एकरी उत्पादन वाढले आहे. तसेच आपल्याकडील जमीनही कपाशी पिकाला पोषक आहे. कापूस विक्रीतून चांगली रक्कम शेतकऱ्याला मिळत असते. आदी गोष्टींमुळे जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढत आहेत.

- डॉ. दिनेश नांद्रे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी केंद्र,धुळे

गेल्या काही वर्षात कपाशीवर पडलेल्या रोगराईमुळे कापूस लागवड परवडत नाही. मात्र इतर पिके खर्चाच्या मानाने परवडत नाही. कोरडवाहू क्षेत्रातही कापसाचे चांगले उत्पन्न येते. कापूस विक्रीतून एकठोक रक्कम मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्याय उपलब्ध नसल्याने, कपाशीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे.

- ॲड. प्रकाश पाटील,

कृषिभूषण,पढावद