शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटाने शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST

सन २०२० हे वर्ष कोरोनाच्या संकटाने ग्रासले. लाॅकडाऊन असला तरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शेतीकामे करण्यास मुभा होती. पीक कर्ज ...

सन २०२० हे वर्ष कोरोनाच्या संकटाने ग्रासले. लाॅकडाऊन असला तरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शेतीकामे करण्यास मुभा होती. पीक कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी शेती केली. परंतु ऐन पिके काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाली आणि हाताशी आलेले पीक गेले, धान्य सडले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने कापूस पिकासह धान्याला हमीभाव दिला असला तरी केवळ दर्जेदार धान्य खरेदीची अट असल्याने शासनाचा हमीभाव शेतकऱ्यांच्या नशिबी आला नाही. खरीप हंगाम हातातून गेला असला तरी रब्बी हंगामात त्याची भरपाई निघेल या आशेवर शेतकरी होता. परंतु रब्बी हंगामात देखील अस्मानी संकट कोसळले. केवळ पंधरा दिवसात पिके हाताशी येणार होती. परंतु पुन्हा वादळी पावसाने हाहाकार माजवला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कर्जबाजारी झाला आहे. पीककर्ज फेडावे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या आधी झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. अशात अजून एकदा राज्याला आणि जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशातच राज्यासह जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. रुग्णसंख्येने गेल्या वर्षाप्रमाणे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. राज्य शासनाने लाॅकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोनाचा हाहाकार पुन्हा माजला आणि लाॅकडाऊन झाले तर प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्थलांतरित मजुरांची सोय, बेरोजगार आणि गरीबांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात प्रशासन अडकून पडले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे युध्द पातळीवर पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे नियोजन शासन, प्रशासनाने करण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्वरित पंचनामे करण्याची मागणी लावून धरली आहे. शिरपूरचे आमदार काशिराम पावरा यांनी प्रशासनाला नुकतेच निवेदन दिले. प्रशासनाने काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू केले असले तरी या मोहिमेला व्यापक गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सद्या पंचनाम्याचे काम पूर्ण होईपर्यंत मागील नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणेदेखील तितकेच गरजेचे आहे.