शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने सतर्क रहा-जिल्हाधिकारी संजय यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

धुळे : भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे. हा सन्मान सार्थ ठरविण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारावर आहे. ...

धुळे : भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे. हा सन्मान सार्थ ठरविण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारावर आहे. सुदृढ आणि मजबूत लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, सुरेखा चव्हाण, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार गायत्री सैंदाणे, अपर तहसीलदार संजय शिंदे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यादव यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांसह उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केल्यावर आपल्याला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. हा मतदानाचा पवित्र हक्क निर्भयपणे, सक्षमपणे मांडण्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी हा असून त्याचा पुढील दिवस हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रजासत्ताकाचा, लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक बनविण्यासाठी आपण कटिबध्द राहिले पाहिजे, अशा आशयाचे घोषवाक्य यावर्षी दिले आहे. लोकशाहीचे विकेंद्रीकरण करत आपण आता ग्रामपातळीपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविणे हा लोकशाहीचा खरा धर्म आहे. मतदारांमध्ये जनजागृतीचे सुरू असलेले निवडणूक विभागाचे काम कौतुकास्पद आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले. तहसीलदार श्रीमती सैंदाणे यांनी प्रास्ताविक केले. अव्वल कारकून वर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी आभार मानले. प्रारंभी सुभाष कुलकर्णी यांनी गीत सादर केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मतदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.