शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यात अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST

सोमवारी धुळ्यातील शासकीय तांत्रिक व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यासाठी ३२ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली ...

सोमवारी धुळ्यातील शासकीय तांत्रिक व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यासाठी ३२ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली होती. सकाळी १०.४० मिनिटांनी पहिला निकाल अंबोडे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. येथे सरपंच असलेल्या अनिल पारखे यांच्या पॅनलने बाजी मारली. त्यांच्या पॅनलमधील सुरेश यादव, शोभा थोरात, मनोज थोरात, प्रमिलाबाई पारखे, बेबीबाई पारखे, योगेश यादव हे विजयी झाले. तर लोकसेवा विकास पॅनलच्या तीन जागा निवडून आल्या. तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काँग्रेसचे भाऊराव पाटील व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती. या ठिकाणी काँग्रेसच्या पॅनलने १६पैकी १२ जागांवर विजय मिळविला, तर बापू खलाणे यांच्या पॅनलला तीन ते चार जागांवरच समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे नेर ग्रामपंचायतीत मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. याठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या गायत्री जयस्वाल यांच्या पॅनलने शंकरराव खलाणे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवित १७ पैकी १० जागांवर विजय मिळविला. या ठिकाणी दोन अपक्षांनाही संधी मिळाली. भाजपचे नेते सुभाष देवरे यांचे गाव असलेल्या बोरीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सुभाष देवरे यांना धक्का दिला. बोरीस ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले. पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील यांच्या उडाणे ग्रामपंचायतीत मतदारांनी त्यांनाही जोरदार धक्का दिला. या ठिकाणी आमदार पाटील यांच्या पॅनलने प्रा. पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला. गरताड येथील ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले. या ठिकाणी नऊपैकी नऊ जागा काँग्रेसने जिंकल्याचे सांगण्यात आले. खंडलाय येथे काँग्रेसने ७पैकी ७ जागा जिंकल्या, तर सरवड येथे परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे ९ जागा जिंकल्या. शिरूडला १७ पैकी १३ काँग्रेसने, तर ४ जागा भाजपने जिंकल्या आहेत.

निकाल ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी

दरम्यान, ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार असल्याने, शहरातील जेल रोड तसेच कमलाबाई कन्याशाळा चौकात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झालेली होती. कारागृह ते कमलाबाई चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता. दोन्ही बाजुंना बॅरिकेट्स लावण्यात आलेले होते. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. गुलाल उधळण्यास तसेच वाद्य वाजविण्यास बंदी असली तरी या चौकाच्या पुढे जात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या तालावर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.

प्रशासनाची दिरंगाई

दरम्यान, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये निकाल लवकर कळत असताना धुळ्यात मात्र प्रशासनाची दिरंगाई दिसून आली. जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींचा निकाल देण्यासही टाळाटाळ केली जात होती. माध्यमांच्या प्रतिनिधींना कुठलेही सहकार्य यावेळी करण्यात आले नाही.