अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी; मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, धुळे दौऱ्यात सुरक्षा वाढविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:09 IST2024-08-12T13:01:37+5:302024-08-12T13:09:13+5:30
Ajit Pawar : गुप्तवार्ता विभागाच्या सुचनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरक्षा वाढवली आहे.

अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी; मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, धुळे दौऱ्यात सुरक्षा वाढविली
Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
"जनतेचा सेवक आहेत, अशा पोकळ धमक्या नेहमी येत असतात. या असल्या धमक्यांना घाबरुन किंवा त्याची चिंता करण्यापेक्षा जनतेचा सन्मान करण्यासाठी हा आमचा दौरा सुरू रोहिलं. आमची ही यात्रा बंद राहणार नाही, असंही मंत्री अनिल पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी रमेश केरेंचा मोर्चा; पवारांनी भेट घेत केली चर्चा
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुळ्यात जनसन्मान यात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकी आल्याचे समोर आले. प्रशासनाने धुळे दौऱ्यात सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.
धुळे दौऱ्यात विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या पोलिसांना मिळाल्या आहेत. या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवली आहे. या धमकीवर बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले, जनतेचा सेवक असल्याकारणाने अजित पवार जनतेमध्ये जाऊन काम करत असतात. त्यातच अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. मात्र आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही, असंही पाटील म्हणाले.
काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार
राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी यात्रा सुरू केल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सनसन्मान यात्रा सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. या दोन्ही यात्रेच्या माध्यमातून दोन्ही गटात एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरेही राज्याचा दौरा करत आहेत.