शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला कोरड घशाला, निधीअभावी रखडले सिंंचनाचे प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून तापी नदीवर सुलवाडे बॅरेज बांधण्यात आले त्यात गेल्या १५ वर्षांपासून बॅरेज बांधून तयार असून दरवर्षी ...

शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून तापी नदीवर सुलवाडे बॅरेज बांधण्यात आले त्यात गेल्या १५ वर्षांपासून बॅरेज बांधून तयार असून दरवर्षी शंभर टक्के धरण भरते. मात्र शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी कोणतीच व्यवस्था शासनाने अद्याप केली नाही व तशी निधीची तरतूददेखील केली नसल्याने आडवलेले पाणी परत पावसाळ्याच्या तोंडावर नदीपात्रात सोडण्यात येते त्यासाठी शासनाने निधी देणे गरजेचे आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील शेतीसाठी तापी नदीतील पाणी बुराईनदीत टाकण्यासाठी तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजमधून उचलून बुराई नदीत टाकण्यासाठी २ फेब्रुवारी १९९९ ला शासनाने मंजुरी दिली. नदीजोड प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आली, त्या वेळी ही योजना ११० कोटींची होती. ती आता ७०० कोटींवर जाऊन पोहोचली तरी चार टप्प्यापैकी अद्याप एकही टप्पा पूर्णत्वास आला नाही. त्यात चार टप्प्यात योजना होणार आहे, त्यात नंदुरबार तालुक्यातील ३ हजार ४२९ हेक्टर, शिंदखेडा तालुक्यातील १ हजार ७०८ हे,तर साक्री तालुक्यातील १ हजार ९४८ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे,मात्र फक्त सर्व्हे करून सदर योजना २० वर्षांपासून प्रकाशा बुराई योजना थंड बस्त्यात पडली होती. ती गेल्या दोन वर्षात आमदार जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी या योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न करून ४१ कोटी निधी आणला त्यात पंपगृहांचे थोडेफार काम झाले आता या योजनेला भरीव निधीची गरज असून त्यात दोन्ही जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे.

तसेच बुराई नदीवरील वाडीशेवाडी मध्यम प्रकल्प गेल्या ५ वर्षांपासून बांधून तयार आहे, त्यात डावा कालवा ८ किमी तर उजवा कालवा १९ किलोमीटरचा असून उर्वरित चिमठाणे येथील जुना कालवा आहे. त्यात डावा कालवा ८ की मी पूर्ण झाला असून सदोष आहे. त्यातून सर्व पाणी गळती होते. तसेच पोटचारीचे काम नसल्याने धरणात मुबलक साठा असूनदेखील शेतीला पाणी येत नाही तीच स्थिती उजवा कालवा व चिमठाणे जुना कालवा दुरुस्तही निधीअभावी रखडून आहे. या ठिकाणीही निधीची आवश्यकता आहे. तसेच अमरावती नदीवरील मध्यम प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरला असून पोटचारीचे कामच निधीअभावी थांबले असल्याने शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेली धरणे पाटचाऱ्या नसल्याने त्याचा फायदा शेतीला होत नाही. त्यात तालुक्यात जी काही कामे जलयुक्त शिवारात झाली त्याचा परिणाम चांगला होऊन शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आले. त्यात सद्या बागायत दिसत आहे धरणाचे पाणी हे निधी नसल्याने पाटचारीचे कामे रखडली असल्याने शोपीस ठरत आहेत. त्याचप्रमाणे तापी नदीवरील २२ उपसासिंचन योजनेला तत्कालीन सरकारने उर्जित अवस्था देऊन दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपये मंजूर केले. त्यात आता किरकोळ दुरुस्ती करून त्यांचे पाणीही शेतीला मिळणार आहे. मात्र तीही निधीअभावी रखडली आहेत. या सर्व सिंचन योजना मार्गी लागल्या तर जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे.