शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

धुळे- भविष्यात पाणीटंचाई उद्भवणाऱ्या धुळे तालुक्यातील गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. ज्या गावांना नवीन पाण्याची टाकी, ...

धुळे- भविष्यात पाणीटंचाई उद्भवणाऱ्या धुळे तालुक्यातील गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. ज्या गावांना नवीन पाण्याची टाकी, पाइपलाइन किंवा पाण्याचा स्रोतासाठी नवीन विहीर आवश्यक आहे. अशा कामांना तातडीने मंजुरी द्यावी. दरम्यान, आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने ८३ गावांचा जल जीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आल्याने पाणीपुरवठा योजनेशी संलग्नित विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

मे आणि जून महिन्यात उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पूर्व नियोजनासाठी आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्याबाबत जिल्हा परिषदेच्या

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेतली. यावेळी आ. कुणाल पाटील यांनी गावनिहाय पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेतली. त्यानुसार ज्या गावांमध्ये सद्य:स्थितीत किंवा मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाई जाणवू शकते अशा संभाव्य गावांकरिता आतापासूनच विहिरींचे अधिग्रहण करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पड्यार यांनी माहिती देताना सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस धुळे तालुक्यातील संभाव्य १२ गावांमध्ये पाणीटंचाई भासू शकते. त्यात आर्णी, चिंचवार, नवलाणे, जुनवणे, अंचाळे तांडा, कुंडाणे (वेल्हाणे), बाबरे, तांडा कुंडाणे, जुन्नर, नावरी, नावरा, रामनगर (नगाव) या गावांचा समावेश आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहणासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी बैठकीत दिल्या. दरम्यान, पांझरा नदी काठावर २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे स्रोत आहेत. त्या गावांत पाणीटंचाई भासू नये म्हणून अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार त्यांनी पांझरेत पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे २९ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे, तर मांडळ, दोंदवाड, विंचूर, बोरकुंड, रतनपुरा या गावांमध्येही मे अखेरीस पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे मांडळ लघु प्रकल्पातून पाणी आवश्यकतेनुसार सोडण्याच्याही सूचना दिल्या. दरम्यान, रामनगर (नगाव) या आदिवासी वस्तीसाठी सातपायरी धरण क्षेत्रात विहीर खोदून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असल्याची माहिती दिली. पाणीटंचाई आढावा बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता जयदीप पाटील, शाखा अभियंता विजय गावित, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, कृउबाचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, पं.स. गटनेते पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, बाबरेचे सरपंच संतोष राजपूत, सुरेश पाटील, गरताडचे ग्रा.पं. सदस्य राजीव पाटील, कृष्णा पाटील, बापू खैरनार, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.