शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

६०० कोटीतून महानगरात विकास कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 12:38 IST

धुळे : शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जरी पाणी पुरवठा करता आलेला नाही. तरी शहरातील ...

धुळे : शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जरी पाणी पुरवठा करता आलेला नाही. तरी शहरातील प्रत्येक भागात पाणीपुरवठा होण्यासाठी १३६ कोटीची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे. नवीन वर्षात काम पुर्णत्वास आल्यानंतर नक्की दिवसाआड का होईना पाणी मिळले असा विश्वास महापौर चंद्रकांत सोनार यांनी व्यक्त केला आहे.भाजपाकडून बहूसंख्य आश्वासन पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मुख्य पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा धरणातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच तापी योजनेतून शहरातील जलकुंभ करण्याचे नियोजन केलेले आहे. तांत्रिक अडचणी, पाणी पुरवठ्याचे नियोजनासाठी विजेची समस्या सोडविण्यासाठी टाटा कन्सलटींग कंपनीला ठेका दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिपत्याखाली सुरळीत पाणीपुरवठा होईल.उद्यानाचा विकासपांझरा नदी किनारी मनपाकडून पाच कोटी रूपयातून उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच ७० लाखांच्या निधीतून महाराणा प्रताप पुतळा परिसर सुशोभिकरण, जुन्या मनपाजवळ खाऊ गल्लीचे काम सुरु आहेत. तर निधी अभावी बंद पडलेले टॉवर बगीचा सुशोभिकरणाचे काम आता महापालिका फंडातून करण्यात येणार आहे.उद्योग व विकास कामांना चालना-शहरातील बेरोजगार तरूणांना रोजगार व मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मनपा शाळा क्रंं. ५, १७, नवरंग जलकुंभ, देवपूर सव्हे् क्रं.७३ तसेच शाळा क्रं. २८ तसेच गुजराथी शाळा अशा विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.ड्रेनेज लाईनकाम सुरू-शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी भुमिगत गटारी कामे केली जात आहे. सध्या देवपूर भागात ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर टप्या-टप्यात केली जातील. हद्दवाढीतही कामे होण्यासाठी सव्हेक्षण केले जात आहे. त्याठिकाणी येणाऱ्या काळात कामे मार्गी लागतील.संपुर्ण शहरात एल. ए. डी-नव्याने समाविष्ठ व नवीन कॉलनी भागात पथदिवे नसल्याने नागरिकांनी गैरसोय होते. जुन्या पथदिव्यांमुळे मनपाला मोठ्या प्रमाणात वीज बिल भरावे लागते. वीजेचा खर्च व नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी शहरात एलएडी पथदिवे बसविण्यात येणार आहे.संरक्षण भिंतीचे काम सुरू-समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी गजानन कॉलनी भागात संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. सध्या ते काम प्रगतीपथावर आहे. तसेच मनपा कर्जमुक्त होण्यासाठी मालमत्ता धारकांनी नव्याने मॅपींग केली जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले.