शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कळमसरे फाट्याजवळ अ‍ॅपेरिक्षा-कंटनेर अपघातात ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:02 PM

शिरपूर : सूतगिरणीतील मजूरांना घेवून जात असतांना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई आग्रा महामार्गावरील कळमसरे फाट्यासमोर सूतगिरणीतील मजूरांना घेवून जाणारा अ‍ॅपेरिक्षा चालक विरूध्द दिशेने रस्ता ओलांडत असतांना इंदूरकडून येणाºया एका कंटनेरने धडक दिल्यामुळे अ‍ॅपेरिक्षातील १ महिला मजूर जागीच ठार झाली तर चालकासह अन्य ७ मजूर गंभीररित्या जखमी झालेत़ दरम्यान, धुळे येथे उपचार घेत असतांना २ जणांचा मृत्यु झाला़ एकूण या अपघातात ३ जणांचा मृत्यु झाला़१८ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कळमसरे फाट्यासमोरील गोल्ड फॅक्टरीसमोर हा अपघात झाला़  शहरातील काही मजूर सूतगिरणीला कामाला आहेत, त्याची ड्युटीवरील बस सुटल्यामुळे ते खाजगी अ‍ॅपेरिक्षा क्रमांक एम़एच़१८-डब्ल्यु-५७०८ ने ७ मजूर सूतगिरणीकडे जायला निघालेत़ अ‍ॅपेरिक्षा चालक उड्डान पूलाचा रस्ता ओलांडून विरूध्द दिशेकडे जाण्यासाठी महामार्ग रस्ता ओलांडत असतांना इंदूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर क्रमांक एम़एच़४६-एफ-७२२८ ने धडक दिल्यामुळे अ‍ॅपेरिक्षाने २-३ पलटी खाल्ली़  त्यात कल्पनाबाई दगा कोळी (वय ४१, रा.भरतसिंग नगर, शिरपूर) ही महिला जागीच ठार झाली तर लक्ष्मीबाई रमेश मराठे (३५), प्रमिलाबाई तुकाराम मराठे (६०), ज्योती दगा कोळी (२०), नरेंद्र दगा मराठे (२५), कविता दगडू अहिरे (३०), सुदामसिंग पदमसिंग राजपूत (६०) सर्व रा.शिरपूर, सुभाष शिलदार पावरा (३६) रा.नेवाली हे जखमी झालेत. अपघाताने झालेल्या आवाजामुळे परिसरातील लोक धावून गेलेत़ त्यांनीच जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढल्यानंतर महामार्ग रूग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले़ डॉ.कल्पेश वाघ, विनोद निकम, भगवान बोरसे आदींनी जखमींवर उपचार केलेत. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले़दरम्यान, धुळे येथे नेत असतांना रस्त्यावरच लक्ष्मीबाई रमेश मराठे (३५) व प्रमिलाबाई तुकाराम मराठे (६०) दोन्ही राहणार भरतसिंग नगर शिरपूर या दोघे महिलांचा मृत्यु झाला़अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत हे पोलिस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झालेत. अपघातानंतर कंटेनर चालक स्वत:हून पोलिसात हजर झाला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. आईचा मृत्यु़़़ मुलगी गंभीरया अपघातात कल्पनाबाई दगा कोळी या विधवा महिलेचा मृत्यु झाला असून तिच्या सोबत मुलगी ज्योती दगा कोळी ही देखील सोबत कामाला जात होती़ ती देखील या अपघातात गंभीर दुखापती झाली आहे़ कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते सूतगिरणीत कामाला जात होते़ मयताला एक लहान मुलगा आहे़अखेर गतीरोधक काढले़़़सावळदे ते पळासनेर गावादरम्यान अनेक ठिकाणी यापूर्वी महामार्गावर अपघात होवू नये म्हणून गतीरोधक टाकण्यात आले होते़ त्यामुळे या मार्गावर मोठ्या संख्येने गतीरोधकांची संख्या वाढली होती़ मात्र गत महिन्यात या महामार्गावरील सारेच गतीरोधक काढून टाकल्यामुळे तेव्हापासून अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसते़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात