शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

३०० पैकी २५० डोस बाहेरच्या लोकांना, स्थानिक लोक वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:37 AM

निजामपूर : निजामपूर - जैताणे परिसरासाठी आलेल्या ३०० कोरोना प्रतिबंध लसीचे २५० डोस ऑनलाईनमुळे बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या २५० ...

निजामपूर : निजामपूर - जैताणे परिसरासाठी आलेल्या ३०० कोरोना प्रतिबंध लसीचे २५० डोस ऑनलाईनमुळे बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या २५० लोकांनी पटकावले व या परिसरातील केवळ ५० लोकांनाच लस मिळू शकली. अनेक स्थानिक लोक रखडले असल्याचा चीड आणणारा प्रकार येथे घडला आहे.

बाहेरचे तुपाशी आणि स्थानिक उपाशी असा हा प्रकार घडला आहे. जैताणे प्राथ. आरोग्य केंद्रात दुपारी बैठक झाली. साक्री पं. स. गट विकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, साक्री तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. के. तडवी, डॉ. अन्सारी, पी. एन. सोनार यांना स्थानिक नागरिकांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ मिळण्याबाबतचे संयुक्त निवेदन देताना निजामपूर व जैताणे सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव व अशोक मुजगे यांनी दिले. यावेळी डाॅ. महेश ठाकरे, महेश राणे, गणेश न्याहळदे, आदी उपस्थित होते.

जिल्हा लसीकरण अधिकरी यांना जैताणे ग्रामपंचायतीने कोविड-१९ लसीकरणाची ऑनलाईन नोंद पद्धत बंद करावी व ऑफलाईन नोंद सुरू व्हावी असे पत्र बैठकीत दिले. जैताणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९ लसीकरण सुरू असून, जैताणे गावात अशिक्षित, आदिवासी, दलित, भटके विमुक्त, शेतकरी व शेतमजूर यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने गावातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने नोंद करता येत नाही. किंवा बहुसंख्य ग्रामस्थांकडे स्मार्ट फोन नाहीत. ऑनलाईन सेशन कधी सुरू होते याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळत नाही. ७ ते ८ मे रोजी ऑनलाईन सेशन ३०० डोससाठी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत एक तास सुरू राहिले. बाहेरील जिल्ह्यातील २५० लोकांनी व गावातील फक्त ५० लोकांचेच रजिस्टेशन झाले. गावातील नागरिकांवर ते अन्यायकारक ठरले. याचा गैरफायदा जिल्ह्याबाहेरील नागरिक घेत असून, गावातील नागरिक लसीकरणापासून अजूनही वंचित आहेत.

त्याकरिता कोविड-१९ लसीकरणाची ऑनलाईन नोंद बंद करण्यात यावी, अन्यथा आम्ही बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांचे लसीकरण होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामपालिका जैताणे यांनी पत्रातून दिला आहे. निजामपूर जैताणे परिसरातील नागरिकांचे "ऑफलाईन" पद्धतीने रजिस्ट्रेशन व लसीकरण करण्यात यावे. लोकसंख्येनुसार लसीचा जास्तीत जास्त साठा जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया- संपूर्ण राज्यभरात कलम १४४ लागू असून, इतक्या कडक निर्बंधांमध्ये अकोला, नगर, उल्हासनगर, वाशिम, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांतीलच नव्हे तर परराज्यातून, सुरत, बलसाड, नवसारी यासारख्या शहरांमधून लोक येईपर्यंत येतातच कसे? हादेखील खरा प्रश्न आहे. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून जैताने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामपालिकेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक कडक उपाययोजना अंमलबजावणीत आणून नियंत्रण आणले आणि बाहेरून आलेल्या अशा लोकांमुळे पुन्हा एकदा गावात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

प्रशासनाने ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन पद्धत तत्काळ बंद करावी, अन्यथा उद्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या बाहेरील व्यक्तींचे लसीकरण होऊ देणार नाही

-अशोक मुजगे,

माजी पंचायत समिती सदस्य साक्री