शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक विमा ...

उस्मानाबाद : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक विमा भरल्यानंतर मदत मिळविण्यासाठी लावण्यात येणारे निकष आडकाठी बनत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. मदत मिळत नसले तर कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

गतवर्षी सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळण्याची आवश्यकता होती. परंतु बहुतांश जणांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली होती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढविल्यास पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती होणे आवश्यक आहे.

३० टक्के शेतकऱ्यांची पाठ

गतवर्षी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला.

नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून पुरेशी भरपाई मिळाली नाही.

सतत हीच स्थिती असूनही मदत मिळत नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नाही.

यंदा ७० टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला. ३० टक्के शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

पॉईंटर..

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

४५००००

पीकविमा काढलेले शेतकरी

गतवर्षी ९४८०००

यंदा ६६७०००

एकूण खरीप क्षेत्र ५१४०.९३

सोयाबीन ३६३१.२३

मूग १८९.०३

उडीद ४९५.१८

मका १०.७९

कापूस २९.९६

तूर ६०१.९१

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकाला विमा देण्याची तरतूद आहे. मात्र कंपन्याच्या जाचक अटीमुळे भरपाईची रक्कम फार कमी आहे. पीक लागवडीचा खर्च गेल्या दोन वर्षात प्रंचड वाढला आहे. त्यातल्या त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. गतवर्षी चार एकर क्षेत्रावरील तूर व सोयाबीनचा विमा काढला होता. पूर्ण पीक वाया गेले. विमा केवळ १६ हजार रुपये मिळाला. नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा लाभ मिळावा.

बन्सी पवार, शेतकरी, किलज

गतवर्षी अडीच एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. या पिकाचा विमा भरला होता. पीक चांगले आले असतानाच काढणीच्या वेळी पाऊस आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. केवळ १४ हजार रुपयांचा विमा मिळाला. गतवर्षीचा अनुभव वाईट आलेल्या आहे. यंदाही विमा काढला सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. कंपनीने नुकसान झालेल्या प्रमाणात भरपाई द्यावी.

राम रोकडे, शेतकरी, कुंभारी