शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST

भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर उस्मानाबाद : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात कोसळले. नवीन कांदा ...

भाजीपाल्याचे भाव कोसळले, कांद्याचे दर स्थिर

उस्मानाबाद : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात कोसळले. नवीन कांदा बाजारात आल्याने भाव ४० ते ५० रुपयांवर स्थिर होते. फळांचा हंगाम संपत आल्याने फळांची दर वाढ झाली आहे. खाद्यतेलाचा दरही वाढत असल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. भाजीपाला व फळभाज्यांसाठी मुबलक पाणीसाठा व पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी, फळभाज्यांचे भाव कोसळू लागले आहेत. बाजारात नवीन कांदा आल्याने कांद्याचे दर स्थिर असून, कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाटा, वांगी १० ते १५ रुपये, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये, शिमला मिरची २० ते ३० रुपये, भेंडी, दोडका ३० रुपये, कारले ४०, गवार, शेवगा ५० ते ६० रुपये किलो, तर टाेमॅटो ५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. पालेभाज्यांचे दरही कमीच असून, मेथी १० रुपये जुडी प्रमाणे, पालक, शेपू, चुका पाच रुपये जुडीप्रमाणे विक्री झाली. फळांचा हंगाम संपत आल्याने फळांच्या दरातही वाढ झाली आहे.

खाद्यतेलाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या सोयाबीन, पामतेल ११४ रुपये, सूर्यफूल तेल १४८ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ ६१, तूर डाळ ८्र०, उडीद डाळ ८०, मूग डाळ ६५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. डाळींचे दर स्थित आहेत. शेंगदाणा ८५ ते ९५ रुपये किलोदराने विक्री होत आहे.

सफरचंद महागले

बाजारात मागील महिन्याभरापासून सफरचंदाचे दर वाढले असून, सफरचंद १२० ते २०० रुपये किलो, संत्रा ४० ते ५० रुपये, चिकू ४० रुपये, द्राक्षे ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे, तर केळी २५ ते ३० रुपये डझनप्रमाणे विक्रीस आहे.

काकडी स्वस्त

मागील काही दिवसांपासून वातावरणात गारठा वाढल्याने काकडीला मागणी घटली आहे. काकडी २० रुपये किलो दराने विक्री होत आहे. गाजराचे दर घसरले असून, गाजर १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री हाेत आहे.

प्रतिक्रिया...

पालेभाज्यांचे दर सातत्याने कमी होत आहेत. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकात विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. खाद्यतेलाचे दर मात्र वाढले असल्याने आर्थिक झळ बसत आहे.

सीमा कांबळे, गृहिणी

टोमॅटो व वांगी प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. भाव पडल्याने लागवडीचा खर्चही निघणेही मुश्कील झाले आहे.

शिवाजी वडवराव, धोत्री, शेतकरी

नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने भाव ४० ते ५० रुपयांवर कायम आहे. इतर भाजीपाल्यांची आवक वाढल्याने तो स्वस्त झाला आहे.

महादेव साठे, भाजीपाला विक्रेता