शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:45 IST

शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला. 

Uddhav Thackeray: शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही, किती मिळाली याची त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून एक आवाहन केले. 'जूनमध्ये दिली जाणारी कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत नाही, हे बोर्ड लावा. निश्चिय करा आणि सगळीकडे फलक लावा', असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुरुवात झाली. त्यानंतर बीड, धाराशिव जिल्ह्यात त्यांनी शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. 

ठाकरे म्हणाले, ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे

धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईवरून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीये. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत, इतिहासातील सगळ्यात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही?", अशा शब्दात ठाकरेंनी सरकारवर टीकेचे बाण डागले. 

"तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही -उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, "नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिका, लोकसभा, विधानसभा... कोणतीही निवडणूक लागली की गावात बोर्ड लावा. कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत नाही. हे जोपर्यंत तुम्ही सरकारला ठणकावून सांगत नाही, तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही", असे आवाहन ठाकरेंनी शेतकऱ्यांना केले. 

"पीक विम्यासाठी १२०० रुपये भरावे लागत आहेत आणि नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तीन रुपये भरपाई मिळत आहे. सहा रुपये मिळत आहेत. काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांवर मोर्चा काढला होता. कोणाला तीन रुपये, सहा रुपये अशी तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विमा कंपन्यांनी येत्या महिनाभरात पंधरा दिवसात शेतकऱ्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्यावी. नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसवर येऊन धडकतील. शहरात ऑफिस असेल, तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन येऊ", असा इशारा ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray: No loan waiver, no votes until government kneels.

Web Summary : Uddhav Thackeray urged farmers to protest until loan waivers are granted. He criticized the government's aid package as a 'historical lie', demanding fair compensation from insurance companies or face farmer protests.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुती