शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:45 IST

शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला. 

Uddhav Thackeray: शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही, किती मिळाली याची त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून एक आवाहन केले. 'जूनमध्ये दिली जाणारी कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत नाही, हे बोर्ड लावा. निश्चिय करा आणि सगळीकडे फलक लावा', असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुरुवात झाली. त्यानंतर बीड, धाराशिव जिल्ह्यात त्यांनी शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. 

ठाकरे म्हणाले, ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे

धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईवरून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीये. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. मुख्यमंत्री म्हणाले आहेत, इतिहासातील सगळ्यात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही?", अशा शब्दात ठाकरेंनी सरकारवर टीकेचे बाण डागले. 

"तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही -उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, "नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिका, लोकसभा, विधानसभा... कोणतीही निवडणूक लागली की गावात बोर्ड लावा. कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत नाही. हे जोपर्यंत तुम्ही सरकारला ठणकावून सांगत नाही, तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही", असे आवाहन ठाकरेंनी शेतकऱ्यांना केले. 

"पीक विम्यासाठी १२०० रुपये भरावे लागत आहेत आणि नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तीन रुपये भरपाई मिळत आहे. सहा रुपये मिळत आहेत. काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांवर मोर्चा काढला होता. कोणाला तीन रुपये, सहा रुपये अशी तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विमा कंपन्यांनी येत्या महिनाभरात पंधरा दिवसात शेतकऱ्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्यावी. नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसवर येऊन धडकतील. शहरात ऑफिस असेल, तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन येऊ", असा इशारा ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray: No loan waiver, no votes until government kneels.

Web Summary : Uddhav Thackeray urged farmers to protest until loan waivers are granted. He criticized the government's aid package as a 'historical lie', demanding fair compensation from insurance companies or face farmer protests.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुती