शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांचा निषेध क्रांतिवीर लहुजी ...

उस्मानाबाद : राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांचा निषेध क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाने नोंदवून अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये सतत मातंग समाजावर अन्याय होत आहे. कंधार तालुक्यात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा पोलीस व प्रशासनाने बळाचा वापर करून काढून मातंग समाजावर लाठीचार्ज केला. महिलांना अमानुषपणे मारहाण केली. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील धनाजी साठे यांच्या अंत्ययात्रेस जातीयवादी गुंडांनी अडवून विटंबना करण्यात आली, चिंचवड येथील अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार करून आरोपी फरार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील मातंग समाजातील अनाथ व मूकबधिर मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला. अशा घटना वाढत आहेत. मात्र, शासानाकडून गुन्हेगारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढत आहे. अशा अत्याचारी जातीयवादी गावगुंडांना आळा बसावा, जलदगती स्वतंत्र न्यायालय स्थापन करून महाराष्ट्रातील मातंग समाजावरील होणारे अन्याय, अत्याचार थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर एम. आर. खिल्लारे, सुरेश खंदारे, संजय साठे, ॲड. राजू कसबे, माणिक साठे, बी. एफ. रसाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.