शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

अचानक परीक्षा रद्द विद्यार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा शनिवारी व ड संवर्गातील परीक्षा रविवारी होणार होती. आरोग्य विभागाने शुक्रवारी ...

उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा शनिवारी व ड संवर्गातील परीक्षा रविवारी होणार होती. आरोग्य विभागाने शुक्रवारी रात्री उशिरा परीक्षा रद्द केल्याची सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामाेरे जावे लागले. तर काही विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात शुक्रवारी पोहोचले होते. या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

परीक्षा देण्यासाठी जे प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहेत, त्या प्रवेश पत्रांवर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना नोएडाचे परीक्षा केंद्र दाखवण्यात आलं आहे. आरोग्य विभाग एवढ्यावरच थांबला नाही तर प्रवेश पत्रांवर अनेक विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नावही बदलण्यात आलं आहे. काहीजणांच्या हॉलतिकीटवर नाव एकाचे व फोटो दुसऱ्याचा होता. पत्रांवर अनेक त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या. परीक्षा एक दिवसावर आली असताना अशा प्रकारे गोंधळ उडाल्याने विद्यार्थी चिंतेत होते. ज्या विद्यार्थ्यांना हॉलतिकिट मिळाले त्यांनी ज्या शहरात परीक्षा केंद्र आहे. त्या शहरात शुक्रवारीच रात्री पोहोचले होते. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द झाल्याचे रात्री उशिरा जाहीर केले. त्यामुळे अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामाेरे जावे लागले. तसेच प्रवास करुन परीक्षा असलेल्या शहरात गेलेल्या विद्यार्थ्यांचा वेळ व पैसाही खर्च झाला.

त्यामुळे विद्यार्थ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शुक्रवारीच पोहोचलो नांदेडला

कनिष्ठ लिपीक पदासाठी ठाणे जिल्ह्यासाठी अर्ज केला होता. परीक्षा केंद्र लातूर निवडले. केंद्र नांदेड आल्याने शुक्रवारीच नांदेड शहरात पोहोचलो. रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याचे समजल्यानंतर हिरमोड झाला. प्रवासाठी ८०० रुपये, राहणे १ हजार २०० रुपये, जेवण असा तीन हजार रुपये खर्च झाला. शिवाय, दोन दिवसाचा वेळही वाया गेला.

आलीम सय्यद, परीक्षार्थी

वर्ग क संवर्गातील लॅब टेक्निशियनची परीक्षा लातूर येथे होणार होती. सकाळी १० वाजता पेपर असल्याने शुक्रवारी लातूर शहरात पोहोचलो. त्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे समजले. यासाठी वेळ व पैसाही खर्च झाला आहे. शासनाने परीक्षा घेता वेळी हॉलतिकीट व्यवस्थित देणे गरजेचे आहे.

दीपक लांडगे, परीक्षार्थी

एकाच शहरात दोन पेपर घ्यावे

काही विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केले. एका परीक्षार्थ्याने टेलिफोन ऑपरेटर व कनिष्ठ लिपीक या पदासाठी अर्ज केले होते. दोन्ही शनिवारीच होणार होते. कनिष्ठ लिपीक पेपर सकाळी १० ते १२ या वेळेत नांदेड येते. तर ३ ते ५ या वेळेत लातूर या शहरात टेलिफोन ऑपरेटर पदासाठी परीक्षा होणार होती. शासनाने यापुढे गैरसोय टाळण्याकरिता एकाच शहरात दोन्ही पेपर घ्यावे. अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून होत आहे.