शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अगोदरच सरपंचपद रिक्त, त्यात उपसरपंचांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST

लोहारा : तालुक्यातील उडरगांव येथील सरपंचपद रिक्त असून, त्यातच आता उपसरपंचानी राजीनामा देऊन दोन महिने लोटले तरी नवीन उपसरपंच ...

लोहारा : तालुक्यातील उडरगांव येथील सरपंचपद रिक्त असून, त्यातच आता उपसरपंचानी राजीनामा देऊन दोन महिने लोटले तरी नवीन उपसरपंच निवडीचा कार्यक्रमच जाहीर न झाल्याने गावातील विकास कामाला ब्रेक लागला आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

लोहारा तालुक्यातील उंडरगाव हे दोन हजार लोकसंख्येचे गाव. येथे प्रत्येक निवडणुकीत वाद ठरलेला. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी बैठकावर बैठका झाल्या. यात सरपंचपद जनतेतून असल्याने सुरूवातीला सरपंचपदासाठी मल्लीनाथ पांचाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर सात सदस्य निवडीसाठी बैठका झाल्या. यात सात पैकी चार सदस्य बिनविरोध काढण्यात आले. परंतु, उर्वरित तीन सदस्यासाठी शेवटपर्यत एकमत न झाल्याने तीन जागेसाठी निवडणूक लागली. त्यानंतर उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होनू या पदावर मुरलीधर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दरम्यान, सरपंच, उपसरपंच गावचा गाढा चालवत असतानाच सरपंच मल्लिनाथ पांचाळ यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याने त्यांचे सरपंचपद रद्द करण्याची तक्रार केली गेली. यामुळे पांचाळ यांचे सरपंचपद रद्द झाले. परिणामी ग्रामपंचायतचा सर्वच कारभार हा उपसरपंच मुरलीधर मोरे यांच्याकडे आला. यानंतर उपसरपंचपद हे आडीच आडीच वर्षासाठी ठरल्याने मोरे यांनी २३ डिसेंबर २०२० मध्ये पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच्याकडे उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. याला आता दोन महीने लोटली तरी अजून नवीन उपसरपंच निवडीचा कार्यक्रमच जाहीर झाला नाही. त्यामुळे गावातील विविध विकास कामे तर थांबली आहेतच, शिवाय ग्रामस्थांना कागदपत्रे देण्यात तसेच गावच्या पाणी पुरवठ्यातही अडचणी येत आहेत.

कोट........

अगोदरच येथील सरपंचपद रिक्त सून, त्यातच उपसरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे मुलभूत सोयी-सुविधा मिळणे कठीण झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन पुढील कार्यवाही करावी.

- महेश ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य

सध्या गावाला सरपंच व उपसरपंच नाही. त्यामुळे दोन वर्षापासून गावचा विकास थांबला आहे. तसेच ग्रामस्थांना विविध प्रमाणपत्रासाठी अडचणीला समोरे जावे लागत आहे.

- दादासाहेब रवळे, नागरिक