शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

नऊ एकरात फिरवला रोटाव्हेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

भूम : गेल्या २२ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा संपल्याने ...

भूम : गेल्या २२ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा संपल्याने तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी तथा हभप सतीश कदम महाराज यांनी पाच एकर सोयाबीन व चार एकर उडीद पिकावर रोटाव्हेर फिरवला.

आष्टा शिवारात शेतकरी कदम महाराज यांची शेती आहे. यंदा खरीप हंगामाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने या शिवारात सोयाबीन व उडीदाची पिके चांगली बहरली. त्यामुळे यातून चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु, २२ जुलैपासून पावसाने खंड दिल्याने पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या आहेत. सोयबीनला कळ्या लागल्या होत्या. परंतु, पाण्याअभावी त्याही गळून पडल्या. असे असतानाही शेतकरी कदम यांनी तुषार सिंचनाच्या माध्यातून पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत कळ्या गळून पडून पिके वाळून गेली होती. पाणी दिले तरी पिकांची वाढच खुंटल्याने त्यांनी १४ ऑगस्ट रोजी चक्क रोटाव्हेर फिरवून रान मोकळे केले.

तालुक्यात २३ दिवसांपासून पाऊस नसल्याने प्रत्यक्षात पेरणी झालेली खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडला तरी या पिकास उपयोग होणार नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे खरीप हंगामावर शेतकऱ्यांनी रंगविलेली सगळी स्वप्ने धुळीस मिळाली असून, बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

कोट......

पेरणीसाठी रान तयार करण्यापासून ते पिके बहरात येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च झाला. फवारणीसाठी जास्तीचे पैसे घालवले. परंतु, पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. यातून उत्पन्नच मिळणार नसल्याने शेवटी सर्व पिकावर रोटाव्हेर फिरवला.

- सतीश कदम महाराज, शेतकरी