शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र क्षमतावाढीचा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST

मुरुम : उमरगा तालुक्यातील आलूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य रोहित्रावर गेल्या पाच महिन्यांपासून भार वाढल्याने ...

मुरुम : उमरगा तालुक्यातील आलूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य रोहित्रावर गेल्या पाच महिन्यांपासून भार वाढल्याने या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या पाच गावांत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. शिवाय, दिवसांतून किमान दहा ते पंधरा वेळा वीजपुरवठा अचानक चालू-बंद होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली रबीची पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. दुसरीकडे अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे. दरम्यान, या कार्यालयाने रोहित्र क्षमतावाढीचा प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी पाठविला असून, अद्याप त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नाही.

या उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी २०१० ते ११ दरम्यान आलूर येथे पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहे. यामुळे मुरुम उपकेंद्रावरील भार काही प्रमाणात कमी झाला. आलूर उपकेंद्र सुरू झाल्याने सुरुवातीच्या काळात काही वर्षे सुरळीत वीजपुरवठा सुरू होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून आलूर उपकेंद्रावर भार वाढल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. आलूर उपकेंद्राअंतर्गत अचलेर, आलूर, केसरजवळगा, वरनाळवाडी, बोळेगाव या पाच गावांना वीजपुरवठा केला जात आहे. या उपकेंद्रात सध्या पाच एमव्हीएचे रोहित्र असून, या रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार झाला आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा तर खंडित होतोच, शिवाय कमी दाबाने होत असल्याने या भागातील शेतातील कृषीपंपही नीट चालत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यावर्षी परिसरात चांगला पाऊस झाल्याने या भागातील तलाव, कुपनलिका, विहिरींना बऱ्यापैकी पाणी आले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस, गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, मका आदी पिकांची लागवड केली आहे. सध्या ही पिके हातातोंडाशी आलेले आहेत. परंतु, विजेअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

दुसरीकडे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे या भागातील गावांत पाणीटंचाईचा प्रश्नही अधिक तीव्र झाला आहे. केसरजवळगा येथील नळांना आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. इतर गावांतही पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे महावितरणकडून या भागातील गावांचा वीजपुरवठा सुरळीतपणे करावा, अशी मागणी नागरिकांंतून होत आहे.

आलूर उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे. त्यामुळे उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पाच एमव्हीएच्या रोहित्राची गरज आहे. शिवाय शेतशिवारातील व गावठाणातील रोहित्रावरही भार वाढला आहे ऑक्टोबर ते मे या महिन्यात विजेची मागणी वाढत असते. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होत असेल. नागरिकांनीही समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत रोहित्राची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार आहे. तो फक्त आलूर उपकेंद्रापुरता मर्यादित नसून अन्य ठिकाणीही आहे.

- आर. एम. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता, उमरगा

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाखालील विहिरीवरील पंप कमी दाबाच्या विजेमुळे दिवसा चालत नाही. त्यामुळे गावात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील नळांना वेळेवर पाणी येत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजपुरवठा करावा, अशी मागणी महावितरणकडे लेखी स्वरुपात केली आहे.

जी. डी. हलबुर्ग, ग्रामविकास अधिकारी, केसरजवळगा

अधिकाऱ्यांना घेराव

महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे रबी पिके संकटात आली आहेत. यामुळे संतापलेल्या आलूर येथील काही शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी उपकेंद्राला टाळे ठोकून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकारानंतर थ्रीफेज वीजपुरवठ्याची वेळ आलूरसाठी रात्री करण्यात येईल, असे सांगून लवकरच वीजपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी टाळे उघडले.