शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

उस्मानाबाद जिल्ह्यात ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 5:41 PM

चालू गळीत हंगामात यंदा जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे़

ठळक मुद्देनऊ कारखान्यांचे बॉयलर पेटले१० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

उस्मानाबाद : चालू गळीत हंगामात यंदा जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे़ या साखर कारखान्यांनी आजवर ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, १० लाख ३१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे़

मागील दोन वर्षात परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली़ परिणामी मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली़ तर दुसरीकडे विहिरी, कुपनलिकांमधील पाणीपातळी वाढ झाल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले़ यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी ९ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे़ या कारखान्यांनी चालू गळीत हंगामात एकूण ११ लाख ९ हजार ७१४ मेट्रीक टन उसाचे गाळप करून १० लाख ३१ हजार ५२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे़  यात मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याने यंदा १ लाख २९ हजार ७६० मेट्रीक टन उसाचे गाळप करीत १ लाख ३२ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.

केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने १ लाख ८० हजार ७६४ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे़ तर १ लाख ७८ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे़ वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याने ८९ हजार ४३५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, ७३ हजार ७०० मेट्रीक टन साखर उत्पादीत केली आहे़ 

रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्याने सर्वाधिक २ लाख ४० हजार ८९० मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, २ लाख ५१ हजार १५० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ भिमाशंकर साखर कारखान्याने ४२ हजार ६७० मेट्रीक टन उसाचे गाळप करून ३६ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ चोराखळी येथील धाराशिव शुगरने ८४ हजार ७३० मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे़ तर ६५ हजार ७६० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.

सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याने १ लाख २२ हजार ८२० मेट्रीक टन उसाचे गाळप करीत ९६ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ लोहारा तालुक्यातील खेड येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने ८९ हजार ९८५ मेट्रीक टन उसाचे गाळप करून ६४ हजार ६६० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ तर मंगरूळ येथील कंचेश्वर शुगरने चालू गळीत हंगामात १ लाख २८ हजार ६६० मेट्रीक टन उसाचे गाळप करून १ लाख ३२ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रOsmanabadउस्मानाबाद