शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दुसरीच टर्म दुसऱ्यांदा मंत्री; बंडातील प्रमुख शिलेदार तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 19:32 IST

विधान परिषदेची तीन वर्षे शिल्लक असतानाही जनतेतून निवडून येण्याचा आग्रह धरत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाची निवड केली.

उस्मानाबाद : शिवसेनेतील फाटाफुटीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या तानाजी सावंतांचे लक फॅक्टर याही वेळी चालले आहे. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळविलेल्या सावंतांना दुसऱ्या टर्ममध्येही मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील वाकाव गावचे. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या सावंतांनी पुढे प्राध्यापकीचा मार्ग निवडून पीएचडीही केली.

जेएसपीएम या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे जाळे महाराष्ट्रभर वाढवत पुढे त्यांनी साखर कारखानदारीतही ऐश्वर्य उभे केले आहे. राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून केलेली. मात्र, तेथे संधीची शक्यता दृष्टिपथात नसल्याने शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अल्प काळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन करीत संघटनेत संपर्कप्रमुख, उपनेते अशी पदे भूषविली. २०१६ साली ते यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर गेले. महायुती सरकारच्या २०१९ मधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे जलसंधारण खाते देण्यात आले. याच कालावधीत जुलैमध्ये तिवरे धरण फुटल्यानंतर ते खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान केल्याने विरोधकांनी धारेवर धरले होते.

दरम्यान, विधान परिषदेची तीन वर्षे शिल्लक असतानाही जनतेतून निवडून येण्याचा आग्रह धरत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाची निवड केली. येथून त्यांनी सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव केला. यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. मंत्रिपदाची जबर महत्त्वाकांक्षा असलेल्या सावंतांनी यामुळे नाराजी व्यक्त करीत स्वपक्षालाही वेळोवेळी शिंगावर घेतले. दरम्यान, सुरुवातीपासूनच बंडखोरीची भाषा बोलणाऱ्या सावंतांनी शिवसेनेत नुकत्याच झालेल्या भूकंपात लीड रोल बजावला होता. त्याची बक्षिसी त्यांना मंत्रिपदाच्या रूपाने मिळाली आहे. त्यांनी पदाची शपथ घेताच उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतOsmanabadउस्मानाबादEknath Shindeएकनाथ शिंदे