शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीतील पुलाचा प्रश्न २५ वर्षांपासून कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची केवळ चार फूट असून, हा पूल प्रत्येक वर्षी पाण्याखाली ...

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची केवळ चार फूट असून, हा पूल प्रत्येक वर्षी पाण्याखाली जातो. गतवर्षीदेखील दोन गावांचा तीन दिवस संपर्क तुटला होता. असे असताना वर्षभरात केवळ पाहणी करण्याशिवाय दुसरी कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही गावकऱ्यांना पुन्हा पाण्यातूनच वाट शोधावी लागणार आहे.

जवळपास ३० वर्षांपूर्वी सांगवी गावाला जोडणाऱ्या या पुलाचे काम करण्यात आले होते. सध्या हा पूल जमिनीबरोबर आला असून, गाळ साचल्याने तलावातून ओव्हर फ्लो होऊन येणारे पाणी पुलावरून वाहाते. त्यामुळे सांगवी, पांगरदरवाडी या दोन गावांच्या गावकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. गतवर्षी परतीच्या पावसात अतिवृष्टी होऊन पुराच्या पाण्यामुळे हा पूल १५ दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यातून वाट शोधत गाव गाठावे लागले. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या पावसाळ्यात होऊ नये, यासाठी सांगवी (काटी) ग्राम पंचायतीच्या वतीने प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ते ग्रामीण विकास संस्था यांच्याकडे अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, वर्षभरात यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ ते पांगरदरवाडी हा पाच किमी रस्तादेखील पूर्णत: खड्ड्यात गेला असून, चालकाना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पावसाळ्यात अपघात होत आहेत.

चौकट

अधिकाऱ्यांकडून केवळ पाहणी

ऑक्टोबर २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सांगवी गावाला पुराच्या पाण्याने दोन्ही बाजुने वेढा घातला होता. गावच्या दोन्ही बाजूचे पूल पाण्याखाली गेल्याने तीन दिवस गावांचा संपर्क तुटला होता. पाणी ओसरल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. त्यावेळी गावच्या पश्चिम बाजूस असलेल्या पुलाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष लोटले तरी कुठलीच कार्यवाही झाली नाही.

आ. पाटील यांची शिफारस

सांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता मगर, उपसरपंच मिलिंद मगर यांनी या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन स्तरावर लेखी पत्रव्यवहार केला. यासोबतच आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीदेखील डिसेंबर २०२०मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या पुलासाठी निधीची मागणी केली होती, अशी माहिती उपसरपंच मिलिंद मगर यांनी दिली.