शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:35 IST

यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़

उस्मानाबाद : एकिकडे तेलंगणाचे सरकार शेतकर्‍यांना २४ तास वीज मोफत देत आहे़ असे असताना भाजप-सेनेचे सरकार मात्र वसुलीचा तगादा लावून शेतकर्‍यांची वीज तोडत आहे़ यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यानंतर उस्मानाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, डॉ.पद्मसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर, प्रवक्ते नवाब मलिक, राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहूल मोटे, विक्रम काळे, जि़.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़ सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठी आश्वासने दिली होती़ पण त्यांची पूर्तता केली नाही़ ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लोकांना फसविण्याचे काम करतंय’, अशा शब्दात सरकारची खिल्ली उडविली़ समाजांचे आरक्षण, नोटबंदी, शाळा मूठभर लोकांच्या हाती देण्याचा डाव, कर्जमाफी अशा विविध मुद्यांवरुनही अजित पवारांनी सरकारवर टीकेची तोफ डागली़

धनंजय मुंडे म्हणाले, सध्या केंद्र सरकारकडून जाहिराती केल्या जात आहेत़ म्हणे ‘देश बदल रहा है’़ देश बदलतोय की नाही ठाऊक नाही; पण सरकारविरोधी ही जनता पाहिल्यानंतर महाराष्ट्र नक्कीच बदलतोय़ औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ३५ निर्णय झाले होते़ त्यापैकी दहा निर्णयावरही अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत हे सरकार महाठग असल्याची टीका मुंडे यांनी केली़ 

कोरेगाव-भीमामागे मनुवादी वृत्ती

भाजप-सेनेचे सरकार काम करण्याऐवजी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करीत आहे़ कोरेगाव-भीमा प्रकरणातील मास्टरमार्इंड कोण? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे़ या घटनेमागे मनुवादी वृत्तींचा हात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला़

भाजपला गाजर, सेनेला मुळा़

भाजप-सेनेचे सरकार नुसती आश्वासनांची गाजरे लोकांना दाखवीत आहे़ काम काहीच करीत नाहीत़ त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला गाजर तर सेनेला मुळा हे निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी उपहासात्मक मागणी अजित पवारांनी केली़

तुळजाईच्या दरबारात ‘गोंधळ’

मराठवाड्यातील आंदोलनाची सुरुवात तुळजापुरातून करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावरच ‘जागरण गोंधळ’ मांडला़ यानंतर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी सरकारच्या कारभारावर नेत्यांनी सडकून टीका केली़ 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे