शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:35 IST

यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़

उस्मानाबाद : एकिकडे तेलंगणाचे सरकार शेतकर्‍यांना २४ तास वीज मोफत देत आहे़ असे असताना भाजप-सेनेचे सरकार मात्र वसुलीचा तगादा लावून शेतकर्‍यांची वीज तोडत आहे़ यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यानंतर उस्मानाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, डॉ.पद्मसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर, प्रवक्ते नवाब मलिक, राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहूल मोटे, विक्रम काळे, जि़.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़ सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठी आश्वासने दिली होती़ पण त्यांची पूर्तता केली नाही़ ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लोकांना फसविण्याचे काम करतंय’, अशा शब्दात सरकारची खिल्ली उडविली़ समाजांचे आरक्षण, नोटबंदी, शाळा मूठभर लोकांच्या हाती देण्याचा डाव, कर्जमाफी अशा विविध मुद्यांवरुनही अजित पवारांनी सरकारवर टीकेची तोफ डागली़

धनंजय मुंडे म्हणाले, सध्या केंद्र सरकारकडून जाहिराती केल्या जात आहेत़ म्हणे ‘देश बदल रहा है’़ देश बदलतोय की नाही ठाऊक नाही; पण सरकारविरोधी ही जनता पाहिल्यानंतर महाराष्ट्र नक्कीच बदलतोय़ औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ३५ निर्णय झाले होते़ त्यापैकी दहा निर्णयावरही अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत हे सरकार महाठग असल्याची टीका मुंडे यांनी केली़ 

कोरेगाव-भीमामागे मनुवादी वृत्ती

भाजप-सेनेचे सरकार काम करण्याऐवजी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करीत आहे़ कोरेगाव-भीमा प्रकरणातील मास्टरमार्इंड कोण? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे़ या घटनेमागे मनुवादी वृत्तींचा हात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला़

भाजपला गाजर, सेनेला मुळा़

भाजप-सेनेचे सरकार नुसती आश्वासनांची गाजरे लोकांना दाखवीत आहे़ काम काहीच करीत नाहीत़ त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला गाजर तर सेनेला मुळा हे निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी उपहासात्मक मागणी अजित पवारांनी केली़

तुळजाईच्या दरबारात ‘गोंधळ’

मराठवाड्यातील आंदोलनाची सुरुवात तुळजापुरातून करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावरच ‘जागरण गोंधळ’ मांडला़ यानंतर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी सरकारच्या कारभारावर नेत्यांनी सडकून टीका केली़ 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे