शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST

लोहारा : चालू हंगामात पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफ व एनडीआरएफअंतर्गत मदत करावी, अशी मागणी रायुकाँचे माजी जिल्हा ...

लोहारा : चालू हंगामात पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफ व एनडीआरएफअंतर्गत मदत करावी, अशी मागणी रायुकाँचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरूनही जिल्ह्यातील अगदी नगण्य शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. परिणामी, चालू हंगामात तीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविली. गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ लाख ४८ हजार ९९० अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. तसेच त्यापोटी शेतकरी व शासनाने पीक विमा हप्ता म्हणून ६३९ कोटी रुपये जमा केले होते. मात्र, यावर्षी केवळ ६ लाख ६७ हजार २८७ अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून, त्यापोटी शेतकरी व शासनाकडून ५८१ कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा होणार आहेत. यांचा अर्थ गेल्या वर्षीपेक्षा दोन लाख ८१ हजार ७०३ शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही.

दरम्यान, यावर्षी पावसाने सतत २३ दिवसांचा खंड दिल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी ३० ऑगस्ट रोजी काढलेली आहे; परंतु त्याचा फायदा केवळ पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकरी नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहणार आहेत. एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत पूर दुष्काळ अतिवृष्टी चक्रीवादळे यापासून होणाऱ्या नुकसानीसाठी मदत करता येते. यावर्षी पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट झाली आहे, तसे महसूल व कृषीचे पंचनामेदेखील आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत देण्यास काहीही अडचण येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.