शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतात पोट, हृदयाचे विकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर केला जात असतो. त्याच तेलाचा पुनर्वापर हा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हॉटेल, हातगाड्यांवर ...

उस्मानाबाद : रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर केला जात असतो. त्याच तेलाचा पुनर्वापर हा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हॉटेल, हातगाड्यांवर मात्र खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात असतो. अशा तेलाचे पदार्थ नियमित खाण्यात आल्याने नागरिकांना हृदयाचे आजार, मेंदूविकार, अपचन असे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे बाहेरील खाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. आहारात समाविष्ट असलेल्या भाज्यांमध्ये खाद्यतेल वापरले असते. त्यातून शरीराला कॅलरीज व पोषक घटक मिळत असतात. त्यामुळे तेल आवश्यकही मानले जाते. मात्र, त्याचा अतरिक वापरही शरीरास हानीकारक ठरू शकतो. त्यात पुनर्वापर केलेले खाद्यतेल सर्वांत घातक ठरू शकते. अशा तेलाचा वापर हॉटेल, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी केला जात असतो. पुनर्वापर झालेल्या तेलापासून पुरेसे उष्मांक भेटत नाहीत. कार्बन घटक वाढतात. त्यामुळे फुफ्फुसाचे आजार वाढण्याची शक्यता असते. हृदयाचे आजार, मेंदूविकार, अपचन असे आजार उद्भवत आहेत. तेलाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा मानला जातो. मात्र, जिल्ह्यात अशा प्रकारे तेलाचा पुनर्वापर करणाऱ्या एकाही विक्रेत्यावर गुन्हा नोंद झालेला नाही.

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वापर एक किंवा दोनदा होणे अपेक्षित आहे. पुनर्वापर वापर केल्यास तेलापासून फुफ्फुसाचे आजार उद्भवू शकतात. अपचनाचा त्रास, किडनीसंबंधीचे आजार, चरबी वाढणे, उच्चरक्तदाब, आतड्यांचे आजाराचा धोका आहे.

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

चिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उघड्यावर विक्रीस असलेले समोसे, वडापाव, भजी असे पदार्थावर ताव मारत असतात. अशा पदार्थ बनविण्यासाठी वारंवार त्याच तेलाचा वापर केलेला असतो. तसेच काही हॉटेलमध्येही दिवसभर त्याच तेलाचा पुनर्वापर करून पदार्थ बनविलेले जातात. त्यामुळे रस्त्यावरील न खाल्लेलेच उत्तम.

डॉक्टरांचा सल्ला

तेलाचा पुनर्वापर झाल्यास त्यात शरीराला कॅलरीज कमी प्रमाणात मिळतात. कार्बन घटक वाढतात. त्यात तळलेले पदार्थ खाण्यात आल्यास अपचनाचा त्रास, फुफ्फुसाचे आजार जडतात. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे.

डॉ. राज गलांडे, फिजिशियन

खाद्यतेलाचा पुनर्वापराने सॅच्युरेटेड फॅट वाढतो. तेलाची क्वालिटी राहत नसल्याने पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे चरबी वाढते, ह्रदय, किडनीचे आजार, उच्चरक्तदाब, आतड्यांचे आजारही उद्भवतात. त्यामुळे पुनर्वापर टाळणे गरजचे आहे.

डॉ. तानाजी लाकाळ, फिजिशियन

तर होईल गुन्हा दाखल

तेलामध्ये २५ टक्क्यापेक्षा जास्त पोलार कम्पांउंड आरोग्यासाठी घातक असतात. दोन ते तीन वेळेपेक्षा तेलाचा वापर करता येत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तेलाचा पुनर्वापर न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पुनर्वापर केल्यास कारवाई केली जाते. तसेच १ लाखांर्यंत दंडही होऊ शकतो.

शि. बा. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न, अन्न व औषध प्रशासन,

अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही

शहरातील हॉटेल, स्वीटमार्ट, उपाहारगृह, हागाड्यांवर तळलेले खाद्यपदार्थ बनवित असतात. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थांची भेसळ होऊ नये, तसेच तेलाचा पुनर्वापर केला जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनान विभागाचे नियंत्रण असते. मात्र, या चालू वर्षात तेलाचा पुनर्वापर केल्याप्रकरणी एकाही कारवाई झालेली नाही.