शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

महिलेवर सामुहिक अत्याचार प्रकरणी चौघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 7:14 PM

महिलेवर सामुहिक अत्याचार केल्या प्रकरणातील तीन आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तर एकाला २७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़

उस्मानाबाद : महिलेवर सामुहिक अत्याचार केल्या प्रकरणातील तीन आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तर एकाला २७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ही घटना तालुक्यातील बेंबळी शिवारात २६ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती़

याबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील एक महिला २६ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गावच्या शिवारातील शेतात शौचास गेली होती़ त्यावेळी चौघांनी सामुहिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य करून मारहाण केल्याची फिर्याद पीडित महिलेने बेंबळी पोलीस ठाण्यात दिली होती़ पीडितेच्या फिर्यादीवरून विष्णू हरिदास डाके (२१), धनंजय योगीराज रसाळ (२१), बालाजी विलास कांबळे (२०), दादासाहेब भाऊराव जानराव (२१) या चौघांविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़

या प्रकरणाचा सपोनि किरण दांडगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर.औटी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली़ या प्रकरणात ११ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे व अ‍ॅड़ आशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी आरोपी विष्णू डाके, बालाजी कांबळे, दादासाहेब जानराव यांना प्रत्येकी २२ वर्षे सक्तमजुरी व ५२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ तर आरोपी क्रमांक दोन धनंजय रसाळ यास २७ वर्षे सक्तमजुरी व ५४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे अ‍ॅड़ कुलकर्णी यांनी सांगितले़