शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पिकांवरील कीड, रोगांची ओळख आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

उमरगा : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकावरील रोग व किडीची ओळख असणे आवश्यक असून, ...

उमरगा : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकावरील रोग व किडीची ओळख असणे आवश्यक असून, बीजप्रक्रिया करून लागवड करणे फायदेशीर ठरणारे आहे, असे मत शेती शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी व्यक्त केले.

तालुका कृषी विभाग व शेतकरी शांतिदूत परिवार यांच्या वतीने तालुका व परिसरातील शेतकऱ्यांसाठी खरीप पिके व फळबाग लागवड या विषयावर बुधवारी ‘शेतकरी - शास्त्रज्ञ परिसंवाद’ येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी, कीडरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे, फळबाग तज्ज्ञ डॉ. गणेश मंडलिक, मृद शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड, हवामान तज्ज्ञ नुकुल हरवाडीकर, शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, माजी कृषी अधिकारी एम.एस. जाधव, प्रा. युसुफ मुल्ला आदींची उपस्थिती होती.

डॉ. भागवत अरबाड यांनी सेंद्रिय खत हा जमिनीचा आत्मा असून, शेतीमध्ये जैविक खताचा वापर करावा व गांडूळ खत शेतीला फायदेशीर असल्याचे सांगितले. डॉ. गणेश मंडलिक यांनी शेतकऱ्यांनी फळबागाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून पहावे. शेती करण्यापूर्वी माती आणि पाण्याचे परीक्षण महत्त्वाचे असून, रोपे खरेदी करत असताना मान्यताप्राप्त नर्सरीमधूनच घेण्याचे आवाहन केले. हवामान तज्ज्ञ नकुल हरवाडीकर यांनी शेतीपूर्वक हवामानाचा अंदाज व पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. तुळजापूर येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांनी शेती करत असताना तज्ज्ञांचे मत घ्यावे, असे सांगितले.

डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी शेती व शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळावी, शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्षीय समारोपप्रसंगी सांगितले. यावेळी समाजसेविका शकुंतला मोरे, माजी सरपंच विलास व्हटकर, भूमिपुत्र वाघ यांचीही उपस्थिती होती. प्रा. जीवन जाधव, गणेश गरुड, प्रा. अभय हिरास, करीम शेख, किशोर औरादे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.