शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वादळ, कोरोनाशी तोंड देत शेतातच थाटले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

अरुण देशमुख / भूम (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. गावांत निर्माण झालेल्या भयावह ...

अरुण देशमुख / भूम (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. गावांत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीमुळे अनेकांनी शेताकडची वाट धरली आहे. देवळाली हे एक असेच गाव. गावात गेल्या २६ दिवसांमध्ये १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे भेदरलेल्या सुमारे ४० टक्के ग्रामस्थांनी घराला टाळे लावून शेतातच संसार थाटला आहे. अगदी वादळाचीही तमा न बाळगता, देवळाली, उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. या गावात कोरोनाने शिरकाव काय केला अन् पुढे ग्रामस्थांची भीतीने गाळणच उडाली. एक महिन्याच्या कालावधीत एकट्या देवळालीत १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर इतर आजाराने १० जण दगावले आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या आता कमी होत असली, तरी मृत्यूचे प्रमाण अधिक होते. ५ मे रोजी तब्बल ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि गावकऱ्यांत अधिक भीती पसरली. गावातील बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय आणि चौकाचौकात कमालीचा शुकशुकाट पाहावयास मिळाला. ग्रामस्थ एकमेकांना बोलण्यासही धजावत नव्हते. वाढत्या मृत्यूच्या कारणाने अनेकांनी थेट शेताची वाट धरली. पत्राचे शेड आणि समोर येईल, त्या परिस्थितीला तोंड देत, ग्रामस्थ शेतामध्ये दिवस काढत आहेत. या काळात दोन वेळा वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् पाऊसही झाला, तरी शेतात मुक्काम ठोकलेल्या ग्रामस्थांनी गाव जवळ केले नाही. दरम्यान, गावचे सरपंच सचिन माने, उपसरपंच सागर खराडे आणि सदस्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहेत. वेळप्रसंगी पीपीई किट घालून मृतांवर अंत्यसंस्कारही केले. गावकारभारी अन् ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. तरीही खबरदारी म्हणून आणखी काही दिवसांसाठी नागरिकांनी शेतातील मुक्काम वाढविला आहे.

प्रतिक्रिया...

गेल्या महिन्यापासून गावची स्थिती वाईट आहे. दवाखान्यात दाखल झालेला रुग्ण परत येतो की नाही, अशी अवस्था झाली होती. गावात असून वावरता येत नव्हते. घराबाहेर जाऊन आले, तरी मनात उलट-सुलट विचार येत असल्याने, आम्ही गेल्या महिन्याभरापासून शेतात शेड मारून राहत आहोत.

- बाबुराव शेटे, ग्रामस्थ देवळाली

गावातच नाही, तर गल्लीपर्यंत कोरोना पोहोचला होता. घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. घरात वयोवृद्ध आणि लहान मुलेही होती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगण्यापेक्षा शेतात कोप करून राहत आहोत. पावसाचा सामना ठीक आहे, पण कोरोना नको, या भीतीने अनेक संकटांना सामोरे जात शेतामध्ये राहत आहोत.

- दिलीप रावसाहेब तांबे, ग्रामस्थ देवळाली

गावात जायचे म्हटले, तरी भीती वाटायला लागली आहे. ना चौकात कोणी बसत, ना ही मंदिरात कोण येत. असले दिवस उभ्या आयुष्यात पाहिले नाहीत. हे सर्व संकट दूर व्हावे आणि पुन्हा गावात खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, हीच इच्छा आहे आता.

- भाऊसाहेब पांडुरंग गायकवाड, ग्रामस्थ देवळाली