शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हॉटेल मागील दोन महिने बंद होते. आता हॉटेल उघडले आहेत. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पदार्थ ...

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हॉटेल मागील दोन महिने बंद होते. आता हॉटेल उघडले आहेत. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पदार्थ पचत नसल्याने अनेकांना पोटाचे त्रास उद्भवू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात चटपटीत पदार्थ खाऊन जिभेचे लाड पुरविताना अनेकांची पंचाईत होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक व सकस आहाराचे सेवन करून पोट सांभाळावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट धडकल्याने मागील दोन महिने हॉटेल बंद होते. त्यामुळे अनेक खवय्यांना बाहेर पदार्थांचा आस्वाद घेता येत नव्हता. मागील काही दिवसांपासून हॉटेल उघडले आहेत. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने अनेकांना बाहेर खाणे अवघड झाले आहे. बाहेरील चटपटीत, तळलेले व जड अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटाच्या समस्या उद्भवू लागत आहेत. अनेकांना जुलाब, उलटी तसेच पोटदुखीचा त्रास होत असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बाहेरील अन्नपदार्थ खाण्याऐवजी घरातील सकस आहार घ्यावा, असे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

पावसाळ्यात हे खायला हवे

पावसाळ्याच्या दिवसात पाणी स्वच्छ गाळून उकळून पिणे.

बाजारपेठेत ऋतूत उपलब्ध असलेले फळे नियमित खाणे.

या दिवसात नियमित गरम पेय व भाज्यांचे सूप पिण्यावर भर द्यावा.

संध्याकाळच्या जेवणात हलका आहाराचा समावेश करावा.

नियमित जेवणात कडधान्य तृणधान्याचा वापर करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात हे खाणे टाळावे.

पावसाळ्यात पचनास कठीण असलेले जड, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

हॉटेल तसेच इतर ठिकाणचे अस्वच्छ पाणी पिणे टाळावे.

हवा बंद डब्यातील पदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याने ते पावसाळ्यात अजिबात खाऊ नयेत.

हातगाड्यांवर उघडे असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.

बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे न धुता खाणे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात माशा तसेच डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. घाणीवरील माशा उघड्यावरील अन्न पदार्थांवर बसल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो. तसेच जुलाब, उलटीची समस्या जाणवू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या दुतर्फा उघडे असलेले अन्न पदार्थ खाणे टाळणेच आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. तसेच बाहेरील अस्वच्छ पाणी पिणेही पोटाच्या आजाराला आमंत्रण देऊ शकते.

आजारतज्ज्ञ काय म्हणतात...

पावसाळ्यात जलजन्य आजाराचा अधिक धोका असतो. त्यामुळे स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचबराेबर बाजारातून आणलेल्या भाज्या तसेच फळे पाण्यात मीठ टाकून धुवून घेतल्यानंतर खाव्यात. उघड्यावरील अन्न पदार्थ, तळलेले व जड पदार्थ खाणे टाळणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

कल्पना दौंडे, आहारतज्ज्ञ

पोटाचे आजार टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे व उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळलेच पाहिजेत. शिवाय, जेवणात हलके भाजलेले व उकडलेल्या पदार्थांचा समावेश करावा. सकाळ-संध्याकाळ कोमट पाणी पिणे, चहामध्ये सुंठ, अद्रक टाकून पिणे, झोपतेवेळी हळद टाकलेले कोमट दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

प्रीती रुपनर, आहारतज्ज्ञ