शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

काढणीला आलेल्या उडीद, मुगाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST

मुरुम : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे उडीद, मुगाच्या राशी खोळंबल्या असून, ...

मुरुम : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे उडीद, मुगाच्या राशी खोळंबल्या असून, काढणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

मुरुम शहर व परिसरातील आलूर, केसरजवळगा, कोथळी, बेळंब, अचलेर, कंटेकूर, तुगाव, नाईकनगर, भुसणी आदी भागांत मागील दहा दिवसांपासून उडीद, मुगाच्या राशी सुरू आहेत. मात्र, ऐन काढणीच्या काळात अधुनमधून पाऊस येत असल्याने ही पिके पाण्यात भिजून नुकसान होत आहे. शिवाय राशीच्या लागवडीचा खर्च देखील दुपटीने वाढला आहे. अनेक संकटांवर मात करून शेतकऱ्यांनी वर्षभर काबाडकष्ट करून आपल्या शेतात पिके जगवली. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे लागवडसाठीचा खर्च जाऊन पदरात दमडाही पडत नसल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे.

सोमवारी पहाटे शहर व परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. रात्री पुन्हा साडेआठच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला. पहाटेपर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. या पावसामुळे परिसरातील काढणीला आलेल्या उडीद, मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. पेरणी व राशीच्या लागवडीचा खर्च कुठून व कसा करायचा? कर्ज कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मंगळवारीही दिवसभर परिसरात ढगाळ वातावण होते.

चौकट........

बाजार समितीत आवकही घटली

मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपासून दररोज चारशे ते पाचशे पोते उडीद आणि मुगाची आवक विक्रीसाठी येत होती. मात्र, पावसामुळे आणि सुट्यांमुळे आवकदेखील सोमवारी व मंगळवारी मंदावल्याचे दिसून आले. पावसामुळे राशी खोळंबल्याने आवकही मंदावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच बाजार समितीलाही पावसाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते. या बाजार समितीत उडदाला ७ हजार २०० ते ६ हजार ३०० रुपये भाव होता, तर मुगाला ७ हजार ते ६ हजार ५०० रुपये भाव होता.

यंत्राद्वारे मळणीच्या दरात दुपटीने वाढ

केसरजवळगा येथील शेतकरी अनिल गुरव यांनी आपल्या तीन एकरांत उडीद आणि तुरीची पेरणी केली आहे. सध्या उडीद काढणीला आला आहे. मात्र, ऐन काढणीच्या काळात पाऊस झाल्याने संपूर्ण उडीद पाण्यात भिजून हजारो रुपयांचे नुकसान झाले. राशीसाठी मजूरही वेळेवर मिळत नसल्याने पंचायत झाली आहे. मळणी यंत्रवालेही ५० किलोच्या एका पोत्यासाठी ३०० ते ४०० रुपये आकारत आहेत. शेतमजूर आणि मळणीयंत्र मालकाच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी २०० रुपये दर होता. मात्र, या वर्षी डिझेलचे भाव वाढल्याचे कारण पुढे करून मळणीचे भाव चक्क दुपटीने वाढवले आहेत.