शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : संपूर्ण राज्यात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत. दीड कोटी संख्या बंजारा समाजाची आहे. समाजाचे मूलभूत प्रश्न ...

उस्मानाबाद : संपूर्ण राज्यात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत. दीड कोटी संख्या बंजारा समाजाची आहे. समाजाचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. राज्यात बंजारा समाजाला व्हीजीएनटी प्रवर्गातून ५.५ टक्के आरक्षण मिळत आहे. मात्र, समाजाचे मूलभूत प्रश्न सुटले नसल्याने बंजारा समाजाला मूळ अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता अनुसूचित जमाती प्रवर्गात आदिवासी ब प्रवर्ग तयार करून बंजारा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी राज्याचे माजी वनमंत्री आमदार सजंय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार सजंय राठोड हे दि. २६ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, देशातील विविध राज्यांमध्ये बंजारा समाजाचे अस्तित्व आहे. सर्वांची बोलीभाषा, पेहराव एकच आहे. परंतु, काही राज्यांत बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहे, तर काही ठिकाणी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे. राज्यात व्ही.जे.एन.टी. प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश आहे. राज्यातील समाजाचे अद्याप मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. काबाडकष्ट करणारा समाज असून, ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम मजूर म्हणून काम करीत आहे. समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणे गरज आहे. मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गाला सध्याचे अस्तित्वात असलेली साडेपाच टक्के आरक्षणाची टक्केवारी अनुसूचित जमातीच्या आरक्षणास बाधित न करता आदिवासी ब प्रवर्ग निर्माण करून आरक्षण आवश्यक आहे, मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गाची जनगणना करून त्याचप्रमाणे अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात यावी, मूळच्या भटक्या विमुक्त ‘अ’ व ‘ब’ या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची जाचक अटक रद्द करणे गरजचे आहे. बंजारा भाषेला २३ भाषेचा दर्जा देण्यात यावा आदी २५ मागण्या समाजाच्या असून, ते सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचे राठोड म्हणाले, याकरिता राज्यभरातील समाजबांधवांशी संवाद साधला जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी टी. सी. राठोड, गुलाबराव जाधव यांची उपस्थिती होती.

राजकारणाची पातळी खाली आली

राजकारणात या अगादेरही आरोप होत होते. मात्र सध्या राजकारण वैयक्तिक पातळीवर आले आहे. उठल्याबरोबरच आज कोणाचा नंबर लागतो हे पाहावे लागते. आरोप करा, चौकशी होऊ द्या, महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा राजकारण्यांनी जपली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मी स्वत: राजीनामा दिला असून, मुख्यमंत्र्यांना चौकशी करा दोषी असलो तर बाजूला करा, नसलो तर घ्या, असे बोललो असल्याचे ते म्हणाले.