शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 6:25 PM

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी

बालाजी अडसूळ 

एकीकडे कांद्याला मिळणाऱ्या उचांकी दराच्या कथा मांडल्या जात असतांनाच दुसरीकडे मात्र परतीच्या पावसाने वाया गेलेल्या कांदा फडावर 'नांगर' फिरवण्याची दुर्देवी वेळ काही कांदा उत्पादक शेतकर्यावर आली आहे.अशीच डोळ्यात पाणी आणणारी वेळ इटकूर येथील बापूराव आडसूळ यांच्यावर ओढवली असून दरवृद्धी चर्चेचा 'हिशोब' तेजीत असतांनाच आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवले आहे.कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी राब राब राबणं शेतकर्यांच्या हातात आहे. बाकी, त्यांला मिळणारी हवामान अन् पाऊसपाण्याची साथ, बाजारातील दर हे सारं काही परस्वाधीन आहे.यामुळेच हा कांदा, कधी उत्पादकांना रडवतो तर कधी त्यांच्या चेहर्यावर हास्य निर्माण करतो असा आजवरचा अनुभव आहे.इटकूर (ता कळंब )येथील बापूराव तुकाराम आडसूळ यांनी खरीप हंगामात दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती.चागंली मेहनत व मशागत करूण पिक जोपासले होते.परंतु, पावसाळ्याच्या पुर्वार्धात टंचाईच्या झळा मागे लागल्या होत्या.यावर चाळीस पाईप अंथरून शेजारच्या शेतकर्याचे पाणी आणले अन् कांदा पिक वाचवले.मात्र ऐन मोक्याच्यावेळी कांदा क्षेत्राला परतीच्या अवकाळी पावसाने गाठले. यामुळे कांदा अन् त्याची मूळ मातीमध्येच नासले.वाढ खुंटली, पाती जळाल्या.बघता बघता संपुर्ण प्लॉट हातचा गेला. उभ्या पिकांवर फिरवला नांगर.... 

अवेळी आलेल्या पावसाने व यात जवळपास एक महिना सातत्य राहिल्याने बापूरावांच्या कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले होते.यामुळे काढणीस लावलेल्या मजूराचा खर्च ही निघाला नसता.बाजार दाखवण्या इतपतही माल निघण्याची शक्यता धुसर झाली होती.यामुळे अखेर त्यांनी आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवून पिक मोडले आहे. लाखाचे बारा हजार ही नाहीत... सद्या कांदा दरवृद्धीच्या कथा शेतकर्यासांठी किती सुखद आहेत असे चीत्र दर्शवले जात असतांना बापूरावांचे मात्र लाखांचे बारा हजार ही झाले नसल्याचे दिसून येत आहे.त्यांनी २५ टन उत्पन्न व २० हजार रूपये टन असा दर गृहीत धरला होता.यानुसार चार ते पाच लाख उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र, सद्या कांद्याला टनाला तर सोडा क्विंटलला वीस हजाराचा दर मिळाला आहे. मात्र, बापूरावांनी विकायचं काय ?. एकूणच, हे उदाहरण प्रातिनिधिक असले तरी शशिकांत गंभिरे, शिवाजी आडसूळ अशा अनेक कांदा शेतकर्यांचे 'लखपती' व्हायचं स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस मिळवले आहे. विम्याचे कवच नाही, खरीप मदत तरी.... कांदा हातचा गेला असतांना दुसरीकडे सदर पिकांचा खरीप हंगाम कृषि विमा योजनेच्या अधिसूचित पिकांत समावेश नसल्याने कांद्याचा विमा भरता आलेला नाही.यामुळे बाधीत क्षेत्रासाठी शेतकर्यांना विमा नुकसान भरपाईचे कवच मिळणार नाही. यामुळे किमान शासनाच्या खरीप मदत वाटपात कांदा पिकांची फळपीकात नोंद घेवून वाढीव मदत द्यावी अशी मागणी बापूराव आडसूळ यांनी केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाOsmanabadउस्मानाबाद