शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

शुद्ध पाणीपुरवठा योजनेत अनियमितेप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकास ५३ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 18:51 IST

ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने तालुक्यातील रूई-दूधी ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून आरओ प्लान्ट बसविण्याचा निर्णय घेऊन सरपंच, ग्रामसेवकाने रक्कमही उचलली होती.

परंडा (उस्मानाबाद ) : ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने तालुक्यातील रूई-दूधी ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून आरओ प्लान्ट बसविण्याचा निर्णय घेऊन सरपंच, ग्रामसेवकाने रक्कमही उचलली होती. परंतु, प्लान्ट कार्यान्वित केला नव्हता. सदरील प्रश्नी तक्रारी झाल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येणार असे दिसताच घाईगडबडीत तब्बल दोन प्लान्ट कार्यान्वित केले. यात चौकशीअंती अनियमितता आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून सरपंच तसेच ग्रामसेवकास ५३ हजारांचा दंड केला आहे.  

रूई-दूधी येथील आरओ प्लान्टबाबत रविशंकर लिमकर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.  त्यानुसार ३० जून रोजी विस्तार अधिकारी ए.एस.कावळे गावात येऊन चौकशी केली असता, चौदाव्या वित्त आयोगातून रुई-दूधी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी २०१५-१६ मध्ये आरओ प्लान्ट बसविण्याची योजना हाती घेतली होती. या कामासाठी तालुकास्तरीय छाननी समिती व यांत्रिकी विभागाने २ लाख ९० हजार रूपये खर्चास तांत्रिक मान्यताही दिली. परंतु, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी  १६ मे २०१६ ते ८ जून २०१६  कालावधीत २ लाख ९४ हजार रूपये उचलून आरओ प्लान्ट बसविण्यासाठीचे साहित्य खरेदी केल्याचे समोर आले.  परंतु, प्रत्यक्षात प्लान्ट ४ आॅगस्ट २०१८ रोजी बसवून कार्यान्वित झाला होता. म्हणजेच तब्बल दोन वर्षानंतर प्लान्ट कार्यान्वित झाल्याचे चौकशी समितीने आपल्या अहवालात निरिक्षण नोंदविले होते.  केलेल्या कामाची मोजमाप पुस्तिकेतील (क्र. ७१०५) पान क्र. ५५ व ५६ वर २ लाख ९० हजार नोंदवले आहे. त्यामुळे पैसे उचलूनही तब्बल दोन वर्ष प्लान्ट कार्यान्वित न केल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवकास  ४९ हजार ३०० रुपये दंड  केला आहे. मूल्यांकनापेक्षा ४ हजार रूपये बँकेतून उचल केल्याचेही दिसले. ही रक्कम वसूलपात्र असल्याचे अहवालात म्हटले आहे. अशाप्रकारे सरपंच व ग्रामसेवकाकडून प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणे ५३ हजार ३०० रुपये वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्र्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

‘बीडीओं’नी बजावल्या नोटिसा

२०१५-१६ मध्ये  नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी आरओ प्लान्ट बसविण्याची योजना रूई-दूधी ग्रामपंचायतीने हाती घेतली होती.  त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून १६ मे ते ८ जून २०१६ या कालावधीत रक्कम २ लाख ९४ हजार इतकी बँक उचल करून आरओ प्लान्टचे साहित्य खरेदी केले होते. प्रत्यक्षात प्लान्ट मात्र २०१८ मध्ये कार्यान्वित झाला. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर ५३ हजार ३०० रूपये वसुलीचे आदेश दिले आहेत. ही रक्कम आठ दिवसांत भरून घेण्याबाबत आदेश असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच तसेच ग्रामसेवकास नाटीस बजावली आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीOsmanabadउस्मानाबादfundsनिधी