शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

४९ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : जिल्हास खरीप हंगामासाठी १५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. सध्या खरीप हंगाम संपत आला आहे. ...

उस्मानाबाद : जिल्हास खरीप हंगामासाठी १५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. सध्या खरीप हंगाम संपत आला आहे. असे असताना केवळ १ लाख २ हजार ४५२ शेतकऱ्यांना ८९० कोटी ६० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ५१ टक्के इतकी आहे. अद्याप ४९ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात वर्षा-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा पिकांचे नुकसान झाले, तर पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर शेतकरी पिके घेत असतात. शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता भासत असते. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी रक्कम मिळावी, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास प्रारंभ झाला. कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात एस.टी. बस बंद असल्याने ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना शहरातील बँकांमध्ये येता येत नव्हते. त्यामुळे कर्ज वितरणाची गती मंदावलेली होती. जून महिन्यापासून निर्बंध शिथिल झाले, तसेच जून महिन्यात पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. जून-जुलै, ऑगस्ट महिन्यातही कर्जवाटपास म्हणावी तशी गती आलेली दिसत नाही. ३० ऑगस्ट अखेरपर्यंत १ लाख २ हजार ४५२ शेतकऱ्यांना ७८० कोटी ६० लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ५१ टक्के इतकी असून, अद्याप ४९ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

असे केले बँकांनी कर्ज वितरीत

बँक ऑफ बडोदा – ४१ टक्के

युनियन बँक ऑफ इंडिया – ६७ टक्के

बँक ऑफ इंडिया – ५८ टक्के

ॲक्सिस बँक – ४१ टक्के

बँक ऑफ महाराष्ट्र – ४६ टक्के

एच.डी.एफ.सी. बँक – २८ टक्के

कॅनरा बँक – ३१ टक्के

आय.सी.आय.सी.आय. बँक – ३३ टक्के

सेंट्रल बँक ऑफ इंडिया – ६९ टक्के

आय.डी.बी.आय. बँक – ५७ टक्के

इंडियन बँक (अलाहाबाद) – ४६ टक्के

रत्नाकर बँक – २३ टक्के

पंजाब नॅशनल बँक – ४३ टक्के

महाराष्ट्र ग्रामीण बँक – ७० टक्के

भारतीय स्टेट बँक – ४० टक्के

डी.सी.सी. – ५७ टक्के

युनो बँक – ३७ टक्के

खरीप हंगाम संपत आला असून, मूग, उडिद पिकाची काढणी सुरू आहे. सोयाबीन पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. पिकाची काढणी, मळणी, मजुरांसाठी पैशांची आवश्यकता भासत आहे. मात्र, अशा स्थितीत पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.