शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 7:04 PM

पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

ठळक मुद्दे९७ प्रकल्पात मृतपाणीसाठा १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा ७४ प्रकल्प कोरडेठाक 

उस्मानाबाद : ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ यात १५० गावांसाठी २३० विंधन विहिरींची अधिग्रहणे आहेत़ १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ विशेषत: जिल्ह्यातील ६४ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले असून, तब्बल ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़

गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ शेतशिवारातील विहिरी, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत़ पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून विंधनविहिरी अधिग्रहण, टँकर सुरू केले जात आहेत़ सध्या जिल्ह्यातील १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ हे टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर दुसरीकडे तब्बल १५० गावांसाठी २३० विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़

उस्मानाबाद तालुक्यातील ७ गावांसाठी १४ टँकर, ५१ गावांसाठी ५८ अधिग्रहणे, तुळजापूर तालुक्यातील १९ गावांसाठी २५ अधिग्रहणे, उमरगा एका गावासाठी एक अधिग्रहण, लोहारा तालुक्यातील ११ गावासाठी १५ अधिग्रहणे, कळंब तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर, ३२ गावांसाठी ५६ अधिग्रहणे, भूम तालुक्यातील सहा गावांसाठी सहा टँकर, दोन गावांसाठी दोन अधिग्रहणे, वाशी तालुक्यातील ११ गावांसाठी ११ अधिग्रहणे, परंडा तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर व २३ गावांसाठी २७ अधिग्रहणे मंजूर करण्यात आली आहेत़

एकीकडे प्रशासन टंचाई निवारणार्थ प्रयत्न करीत आहे़ मात्र, दुसरीकडे प्रकल्पातील पाणीपातळीतही झपाट्याने घट होत आहे़ सध्या जिल्ह्यातील ६४ प्रकल्प कोरडेठाक असून, ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ ३७ प्रकल्पात २५ टक्क्यांहून कमी उपयुक्त पाणी आहे़ १८ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर सहा प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी आहे़ केवळ एका प्रकल्पात ७५ टक्क्यावर उपयुक्त पाणी आहे़

टँकर सुरू असलेली गावेउस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बा़), रूई (ढो़), नांदुर्गा, खामगाव येथे प्रत्येकी एक तर येडशी येथे सहा व बेंबळी येथे तीन टँकर सुरू आहेत़ कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव येथे प्रत्येकी एक, भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरूड, सावरगाव, वारंवडगाव कासारी प्रत्येकी एक तर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी येथे प्रत्येकी टँकर सुरू आहे़ या सर्व गावातील ५४ हजार ४६४ नागरिकांची टँकरद्वारे तहान भागविली जात आहे़

मोठ्या प्रकल्पांची स्थितीजिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या सिना-कोळेगाव प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात ६़५८ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे़ तर केज येथील मांजरा प्रकल्पात मृतपाणीसाठा आहे़

चार मध्यम प्रकल्प कोरडेठाकउस्मानाबाद तालुक्यातील रूईभर, परंडा तालुक्यातील खासापूर, चांदणी व साकत हे चार मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत़ तर उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, वाघोली, कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांची स्थितीही बिकट आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद