शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

एकच आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेची हत्या; ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:32 IST

Woman killed for eating a single mango : २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.

संभल : जिल्ह्यातील आंबा खाण्याच्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी २९ वर्षांच्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ३ आरोपींना जन्मठेपेची तर २ आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.एका आंब्यावरून वाद झालाआंब्याच्या बागेत अल्पवयीन मुलाने जमिनीवर पडलेला केवळ १ आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला. हे प्रकरण संभल जिल्ह्यातील बनियाथेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमालपूर गावचे आहे. सरकारी वकील हरी ओम प्रकाश यांनी सांगितले की, १९९१ मध्ये जमालपूर गावात एका अल्पवयीन मुलाने आंब्याच्या बागेत जमिनीवर पडलेला आंबा खाल्ल्याने दोन गटामध्ये जोरदार भांडण झाले होते. यामध्ये एका बाजूने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारामारी आणि भांडणात दुसऱ्या बाजूचे अनेकजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही गटांच्या लोकांनी न्यायालयात एकमेकांविरुद्ध खटलाही दाखल केला होता. सुमारे २९ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता.

नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या महिलांची काढली छेड, मग लग्नही मोडलंदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या हत्येप्रकरणी राम बहादूर, श्योराम आणि भुरा या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर दुसरीकडे साबीर आणि निजामुद्दीन यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच २०-२० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आंबे खाणाऱ्या अल्पवयीन सूरजलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, घटनेवेळी सूरज हा अल्पवयीन होता, त्यामुळे सूरजचे प्रकरण अद्याप बाल न्यायालयात प्रलंबित आहे. तर २९ वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका गटातील तीन आणि दुसऱ्या गटाच्या एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपjailतुरुंगDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCourtन्यायालय