शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एकच आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेची हत्या; ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:32 IST

Woman killed for eating a single mango : २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.

संभल : जिल्ह्यातील आंबा खाण्याच्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी २९ वर्षांच्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ३ आरोपींना जन्मठेपेची तर २ आरोपींना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २९ वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ४ आरोपींचा मृत्यूही झाला आहे.एका आंब्यावरून वाद झालाआंब्याच्या बागेत अल्पवयीन मुलाने जमिनीवर पडलेला केवळ १ आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला. हे प्रकरण संभल जिल्ह्यातील बनियाथेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमालपूर गावचे आहे. सरकारी वकील हरी ओम प्रकाश यांनी सांगितले की, १९९१ मध्ये जमालपूर गावात एका अल्पवयीन मुलाने आंब्याच्या बागेत जमिनीवर पडलेला आंबा खाल्ल्याने दोन गटामध्ये जोरदार भांडण झाले होते. यामध्ये एका बाजूने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारामारी आणि भांडणात दुसऱ्या बाजूचे अनेकजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही गटांच्या लोकांनी न्यायालयात एकमेकांविरुद्ध खटलाही दाखल केला होता. सुमारे २९ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता.

नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या महिलांची काढली छेड, मग लग्नही मोडलंदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या हत्येप्रकरणी राम बहादूर, श्योराम आणि भुरा या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर दुसरीकडे साबीर आणि निजामुद्दीन यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच २०-२० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आंबे खाणाऱ्या अल्पवयीन सूरजलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, घटनेवेळी सूरज हा अल्पवयीन होता, त्यामुळे सूरजचे प्रकरण अद्याप बाल न्यायालयात प्रलंबित आहे. तर २९ वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका गटातील तीन आणि दुसऱ्या गटाच्या एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपjailतुरुंगDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCourtन्यायालय