शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Tauktae Cyclone : पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:16 IST

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे.

ठळक मुद्दे पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-३०५ या बार्जवरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पी-३०५ बार्जचा अपघात: चिंता, हुरहुर अन् अश्रू; आप्तांना शाेधण्यासाठी कुटुंबीयांची शवागृहाबाहेर गर्दी 

 

तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे. वादळाच्या तडाख्यात पी-३०५ हा बार्ज बुडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जणांचा शोध अद्याप सुरु आहे. ओएनजीसी कंपनीसाठी काम करणारे पी-३०५ हे बार्ज तौक्ते चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतरही समुद्रातच होते. १६ मे रोजी मध्यरात्रीनंतर बार्जचा नांगर तुटला. त्यानंतर १७ मे रोजी त्यांनी मुंबईच्या डिजिटल कम्युनिकेशन (डीजीसीओएम) केंद्राला नांगर तुटल्याबाबत माहिती दिली होती त्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. तटरक्षक दल, भारतीय नौसेना यांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या अनेकांचे जीव वाचवले. 

पी-३०५ बार्जचा नांगर हा तौक्ते चक्रीवादळाच्या आधीच तुटला होता अशी माहिती मिळत आहे. मात्र, डीजीसीओएमने यासंदर्भात ओनजीसीचे प्रवक्ते हरीश अवल यांना कळवले असता त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. ऍफकॉन्सने त्यांची माणसे समुद्रात पाठवली होती अशी माहिती हरीश अवल यांनी दिली. ऍफकॉन्स ही कंपनी ओनजीसीसाठी काम करते. ऍफकॉन्सची माणसे त्या बार्जवर काम करत होती. मात्र ऍफकॉन्स  आणि ओएनजीसी या दोन्ही कंपन्यांनी बार्जची मालकी असणारे डूरमास्ट एंटरप्राइजेज आणि बार्जच्या कॅप्टनला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे.

आतापर्यंत ओळख पटलेल्यांची नावेनीलेश प्रकाश पितळे (वय ४५),  जोमीश जोसेफ (३५), अमलराज बर्नाबस (४३), विशाल वसंत काठदरे (३५), नवीन कुमार (२९), गोलेख चंद्रा साहू (५२), ससिन इस्माईल (२८), सुशील कुमार (२३), प्रमोद पाठक (४५), मनप्रीत बलवंत सिंह (२६), पप्पुराम उदाराम (३२), योगेश गिर गोसावी, अजहर युनुस गडी (२५), मोहन वामसी कृष्णा (३३), अजय शिवप्रसाद सिंग (३९)

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळPoliceपोलिसMumbaiमुंबईDeathमृत्यू