शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:43 IST

Sushant Singh Rajput Suicide : शिवसेना नेत्याने सुशांत आणि अंकिता यांच्या ब्रेकअपच्या चौकशीची केली असल्याची चर्चा होती.

ठळक मुद्देदुसरीकडे, बिहार आणि महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या या प्रकरणात एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. एचएएमचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी पाटणा पोलिसांना ईमेल पाठवून ही तक्रार दाखल केली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सतत कुठले ना कुठले वक्तव्य केले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत सतत वक्तव्य करून आणि लेख लिहून आपले मत मांडत असतात. या प्रकरणी आता संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जात आहे, ही तक्रार पाटणा येथे दाखल करण्यात आली आहे.एचएएमचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी पाटणा पोलिसांना ईमेल पाठवून ही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये संजय राऊत यांच्याशिवाय बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर, बीएमसी अधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये चौकशी व अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.संजय राऊत हे सुशांत प्रकरणात सतत वक्तव्य करत आहेत, त्यामुळे वाद वाढला आहे. अलीकडेच संजय राऊत म्हणाले होते की, सुशांत आणि त्याचे वडील यांचे नाते चांगले नव्हते, कारण वडिलांनी पुन्हा लग्न केले होते. याशिवाय शिवसेना नेत्याने सुशांत आणि अंकिता यांच्या ब्रेकअपच्या चौकशीची केली असल्याची चर्चा होती.दुसरीकडे, बिहार आणि महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या या प्रकरणात एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे, तर महाराष्ट्र सरकार त्यास विरोध करत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे की, ही आत्महत्या मुंबईत घडली आहे, अशा परिस्थितीत पाटणा पोलिसांना चौकशीचा अधिकार नाही.यापूर्वी बिहार पोलिसांचे काही अधिकारी तपासासाठी मुंबई येथे पोहोचले होते, पण त्यांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळू शकले नाही. त्याच वेळी एका अधिका्याला जबरदस्तीने विलगीकरण कक्षात ठेवले गेले, त्यानंतर बिहार पोलिस अधिकारी परत आपल्या राज्यात आले. बिहार पोलिस आणि बिहारच्या नेत्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार-महाराष्ट्र पोलिसांकडून तपास योग्यप्रकारे न केल्याचा आरोप केला जात आहे.दुसरीकडे, बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी केलेली शिफारस केंद्राने मान्य केली. दरम्यान, रिया चक्रवर्ती हिने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालय 13 ऑगस्ट रोजी याबाबत निर्णय देईल. याशिवाय सुशांतच्या खात्यातून काढण्यात आलेल्या 15 कोटींबाबत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांकडून सतत विचारपूस करत आहे. आतापर्यंत ईडीने रियाचे भाऊ-वडील आणि सुशांतचे माजी व्यवस्थापकची देखील चौकशी केली आहे, अशी माहिती आज तकने दिली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

 

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

 

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्तMayorमहापौरSanjay Rautसंजय राऊतBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्र