राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:24 IST2025-06-18T17:07:00+5:302025-06-18T17:24:49+5:30

मेघालयमधील शिलाँग येथे घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे गूढ आता उलगडले आहे. आता सोनमबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sonam was going to marry 'this' person, not Raja Raghuvanshi, they matched even 25 points! Then why did the relationship break? | राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 

राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 

मेघालयमधील शिलाँग येथे घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे गूढ आता उलगडले आहे. पोलिसांनी आरोपी सोनम रघुवंशीला (राजाची पत्नी) आणि तिच्या साथीदारांना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली, जिथे सोनमने तिचा पती वेदनेने तडफडून मरताना पाहिल्याचे उघड झाले. या घटनेनंतर मेघालय पोलिसांनी इंदूरमधील सोनमच्या फ्लॅटचीही झडती घेतली, जिथे ती १४ दिवस लपून बसली होती.

सोनमबद्दल आणखी एक धक्कादायक सत्य उघड!
आता सोनमबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजा रघुवंशी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी मध्य प्रदेशातील धार येथील एका व्यापारी कुटुंबातील मयांक रघुवंशी नावाच्या मुलासाठी सोनमला पसंत करण्यात आले होते. दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी तयारी केली होती आणि कुंडली जुळवल्या, तेव्हा ३६ पैकी २५ गुण जुळले होते.

मात्र, मयांकच्या कुटुंबाने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. ज्योतिषाने कुंडली काळजीपूर्वक तपासल्यानंतर सांगितले की, हे लग्न त्यांच्यासाठी योग्य नाही आणि यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. ज्योतिषाच्या या सल्ल्यानंतर, मयांकच्या कुटुंबाने सोनमचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर, मयंकच्या कुटुंबाने देवाचे आभार मानले की त्यांनी सोनमचा प्रस्ताव स्वीकारला नाही, अन्यथा आज त्यांचा मुलगा कदाचित जिवंत नसता.

सोनम आणि राजाचे नाते कसे जुळले?
इंदूर येथील राजा रघुवंशी यांच्याशी सोनमचे नाते रामनवमीला प्रकाशित होणाऱ्या 'रघुवंशी रिश्ता' मासिकातून जुळले. या मासिकात दोघांचा परिचय प्रकाशित झाला आणि त्यानंतर दोन्ही रघुवंशी कुटुंबांनी त्यांना एकमेकांसाठी पसंत केले. ऑक्टोबरमध्ये सोनम आणि राजाचे लग्न ठरले आणि ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी लग्न केले. त्यानंतर तीन महिन्यांनी, ११ मे रोजी त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. २० मे रोजी दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले आणि २३ मे रोजी सोनमने राजाची हत्या केली.

लग्नापूर्वीपासूनच सोनमचे अफेअर आणि हवाला व्यवसाय
पोलिसांच्या तपासानुसार, सोनमचे तिच्या वडिलांच्या प्लायवूड कंपनीत काम करणाऱ्या राज कुशवाहा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. सोनम कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यांचे काम पाहत असे आणि याच दरम्यान तिची राजशी जवळीक वाढली. नंतर, दोघेही हवाला व्यवसायात सामील झाले, जिथे सोनमने अवघ्या आठ महिन्यांत लाखो रुपये कमावले. राजच्या प्रेमाच्या आणि हवाला व्यवसायातून मिळालेल्या पैशाच्या लोभातून सोनमने आपल्या पतीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

Web Title: Sonam was going to marry 'this' person, not Raja Raghuvanshi, they matched even 25 points! Then why did the relationship break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.