शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! बोहल्यावर चढण्याआधी नवऱ्याने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 17:09 IST

मेधचाल जिल्ह्यामधील कोम्पल्ली येथे ही धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देएन. एस. संदीप असं मृत तरुणाचं नाव आहे. संदीपने पंख्याला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दृश्य समोर होते. या घटनेमुळे नववधू आणि तिच्या वडीलांना मोठा धक्का बसला असून दोघांनाही उपाचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील एका तरुणाने लग्नालाअर्धा तास बाकी असताना लग्न मंडपामध्येच बोहल्यावर चढण्याआधी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नववधू आणि तिच्या वडीलांना मोठा धक्का बसला असून दोघांनाही उपाचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मेधचाल जिल्ह्यामधील कोम्पल्ली येथे ही धक्कादायक घटना घडली. एन. एस. संदीप असं मृत तरुणाचं नाव आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार संदीप हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता असून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधी त्याने आपल्या जीवनाचा प्रवास संपविला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याचं लग्न ठरलं होतं. चांगली नोकरी करणारा नवरा मुलगा मिळाल्याने मुलीकडील मंडळी आनंदी होती. लग्नासाठी दोन्ही कुटुंबांने जोरदार तयारी केली होती. वर आणि वधू यांच्याकडील अनेक पाहुणे लग्नसोहळ्यासाठी मंडपामध्ये उपस्थित होती.

नवरी मुलगी वधूपक्षासाठी देण्यात आलेल्या रुममध्ये आणि नवरा मुलगा वरपक्षाच्या रुममध्ये लग्नासाठी तयार होत होते. लग्न मुहूर्ताच्या काही वेळआधी मुलगी लग्न मंडपामध्ये येऊन उभी राहिली. त्यावेळी सर्व नातेवाईक संदीपची वाट पाहत होते. मुहूर्त जवळ आला तरी संदीप लग्न मंडपात आला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी संदीपच्या रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र, काहीही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर रूमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी संदीपने पंख्याला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दृश्य समोर होते. संदीपला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आलं. संदीपने आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नसून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस