शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

अक्षय कुमारवर वादग्रस्त १०० कोटींच्या व्यवहारासंबंधी पंजाब एसआयटीने केला प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:49 PM

राम रहीमची ओळख कशी झाली? कुठे झाली? असे प्रश्न त्याला विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, राम रहीमला आपण कधीही भेटलो नाही असं अक्षयनं ठामपणे सांगितलं. या प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आल्याचे अक्षयने सांगितले. महत्वाचे म्हणजे 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीम सिंग आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यात झालेल्या १०० कोटीच्या व्यवहारासंबंधी अक्षयला अनेक प्रश्न विचारण्यात आले. 

ठळक मुद्देपंजाब विशेष तपास पथकाने (एसआयटी) अभिनेता अक्षय कुमार याची आज दोन तास कसून चौकशी केलीमहत्वाचे म्हणजे 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीम सिंग आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यात झालेल्या १०० कोटीच्या व्यवहारासंबंधी अक्षयला अनेक प्रश्न विचारण्यात आले.  चित्रपटात गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात राम रहीमची निर्दोष सुटका झाली होती

चंदीगड - शीख धर्मातील पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाब विशेष तपास पथकाने (एसआयटी) अभिनेता अक्षय कुमार याची आज दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीत अक्षय कुमारला ४२ प्रश्न विचारले. अक्षयने  या प्रश्नांची उत्तरे देताना त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अधिकाऱ्यांनी अक्षयला राम रहीमच्या भेटीबद्दल अनेक प्रश्न विचारले. राम रहीमची ओळख कशी झाली? कुठे झाली? असे प्रश्न त्याला विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, राम रहीमला आपण कधीही भेटलो नाही असं अक्षयनं ठामपणे सांगितलं. या प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आल्याचे अक्षयने सांगितले. महत्वाचे म्हणजे 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीम सिंग आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यात झालेल्या १०० कोटीच्या व्यवहारासंबंधी अक्षयला अनेक प्रश्न विचारण्यात आले. 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा राम रहीम सिंगचा 'मेसेंजर ऑफ गॉड' नावाचा एक चित्रपट सप्टेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात राम रहीमची निर्दोष सुटका झाली होती. मात्र, पंजाबमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. तो विरोध डावलून चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय राम रहीम आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या बैठकीत झाला होता. ही बैठक अक्षयकुमारच्या घरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळं अक्षय कुमार अडचणीत सापडला होता. धर्मग्रंथाचा अवमान केल्याप्रकरणी अक्षय कुमार, राम रहीम आणि सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सुखबीर सिंग बादल आणि अक्षय कुमार या दोघांना एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आज अक्षय एसआयटीसमोर हजर झाला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkshay Kumarअक्षय कुमारbollywoodबॉलिवूड